September 8, 2024

Month : February 2023

काय चाललयं अवतीभवती

साखर कंपन्याच्या शेअर्समधील गुंतवणुकीबाबत…

“साखर कंपन्याच्या शेअर्समधील गुंतवणुकीबाबतचा” प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा विशेष लेख… भारतीय शेअर बाजारांमध्ये गेल्या वर्षभरात खूप हेलकावे पूर्ण वातावरण राहिले. २०२२  या वर्षांमध्ये मुंबई शेअर...
काय चाललयं अवतीभवती

हालमत संस्कृती संवर्धन शिबिरात लोककलांचे सादरीकरण (व्हिडिओ)

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्राच्या वतीने कोल्हापूर येथील सकल धनगर समाज आणि कुपवाड येथील श्री हालमत सांप्रदाय मंडळा यांच्यावतीने कसबा बावडा...
काय चाललयं अवतीभवती

देशा बाहेर जाणारा पैसा रोखण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

‘कृषी आणि सहकार’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्न मोदी यांनी केलेले संबोधन  गेल्या आठ-नऊ वर्षांप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला खूप जास्त महत्व देण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थसंकल्पाच्या दुसर्‍या दिवशीची वृत्तपत्र तुम्ही बघितली, तर हेच दिसेल, की प्रत्येक अर्थसंकल्पाला गाव, गरीब आणि शेतकऱ्याचा अर्थसंकल्प असंच म्हटलं गेलं आहे. 2014 मध्ये कृषी क्षेत्राचा अर्थसंकल्प 25 हजार कोटी पेक्षाही कमी होता, आम्ही येण्या पूर्वी. आज देशाचा कृषी क्षेत्राचा अर्थसंकल्प वाढला असून, तो 1 लाख 25 हजार कोटी रुपयांहून जास्त झाला आहे. मित्रहो, स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ आपलं कृषी क्षेत्र टंचाईच्या सावटाखाली राहिलं. आपल्या अन्नसुरक्षेसाठी आपण जगावर अवलंबून होतो. पण आपल्या शेतकऱ्यांनी आपल्याला केवळ आत्मनिर्भरच बनवलं नाही, तर आज त्यांच्यामुळे आपण निर्यात करण्यासाठीही सक्षम झालो आहोत. आज भारत अनेक पद्धतींनी कृषी उत्पादनांची निर्यात करत आहे. आपण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत शेतकऱ्याचा प्रवेश सुकर केला आहे. पण आपल्याला ही गोष्टही लक्षात ठेवायला हवी, की आत्मनिर्भरता असो, की निर्यात असो, आपलं उदिष्ट केवळ तांदूळ, गहू इथवरच सीमित राहता कामा नये.  कृषी उत्पादनांच्या क्षेत्रातही आत्मनिर्भर होण्यावर अर्थसंकल्पात भर उदाहरणार्थ, 2021-22 मध्ये डाळींच्या आयातीवर 17 हजार कोटी रुपये खर्च करावे लागले. पोषण- मूल्यवर्धित खाद्यपदार्थांच्या आयातीवर 25 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याचप्रमाणे 2021-22 मध्ये खाद्यतेलाच्या आयातीवर दीड लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले. केवळ एवढ्याच वस्तूंच्या आयातीवर सुमारे २ लाख कोटी रुपये खर्च झाले, याचा अर्थ इतका पैसा देशाबाहेर गेला. आपण या कृषी उत्पादनांच्या क्षेत्रातही आत्मनिर्भर बनलो, तर हाच पैसा आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रांना पुढे नेण्यासाठी अर्थसंकल्पात निर्णय घेतले जात आहेत. आम्ही एमएसपी वाढवला, डाळींच्या उत्पादनाला चालना दिली, अन्न प्रक्रिया करणाऱ्या फूड पार्कची संख्या वाढवली. त्याच बरोबर, खाद्य तेलांच्या बाबतीत पूर्णपणे आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने मिशन मोड मध्ये काम सुरु आहे. मित्रांनो, जोपर्यंत आपण कृषी क्षेत्राशी निगडीत आव्हानं दूर करत नाही, तोपर्यंत संपूर्ण विकासाचं उद्दिष्ट गाठता येणं शक्य नाही. आज भारतातली अनेक क्षेत्र झपाट्याने प्रगती करत आहेत, आपले ऊर्जामय युवा त्यात सक्रियपणे सहभागी होत आहेत. त्यांना कृषी क्षेत्राचं महत्व आणि या क्षेत्रात पुढे जाण्याचा शक्यता माहीत असूनही, या क्षेत्रातली त्यांची भागीदारी कमी आहे. खासगी नवोन्मेष आणि गुंतवणूक या क्षेत्रापासून अजूनही दूर आहे. ही मोकळी जागा भरून काढण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ...
पर्यटन

मंड्या जिल्ह्यातील रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य

मंड्या जिल्ह्यातील रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्यास आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी भेट दिली. या अभयारण्यात सहा बेटं आणि त्यामध्ये अनेक छोटी छोटी बेटं...
सत्ता संघर्ष

2025-26 पर्यंत 20%  इथेनॉल मिश्रणाचे देशाचे उद्दिष्ट

‘हरित विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “हरित ऊर्जा ” या विषयावर  आधारित अर्थसंकल्प-पश्चात वेबिनारला संबोधित केले.  2023 च्या...
कविता

येलीचा तोरा !!

येलीचा तोरा !! येलीन येढारलं! झाड दिसेना ! सोताले वानवे ! आव महारानीचा !! पोशिंदा झाड! शांत बिचारा! जारुन सोताले! महान विचारा ! ! येलीनं...
विश्वाचे आर्त

डोळसपणे कर्म केल्यास यश निश्चितच

जीवघेणी स्पर्धा ही स्पर्धा नव्हे. सांगण्याचा हेतू इतकाच, की या नव्या युगात आंधळ्यासारखा व्यवहार नको. आंधळ्याचे हाती दिवा जरी दिला तरी त्याला वाट शोधता येत...
मुक्त संवाद

माझ्या जगण्याचे पुस्तक – प्रांजळ आत्मकथन

पुस्तकांचे महत्त्व अधोरेखीत करणारे बोते सर स्वत:च्या आयुष्याचा पट ‘माझ्या जगण्याचे पुस्तक’ या पुस्तकातून उलगडत जातात. तो निश्चितच वाचनीय आहे. प्रा. व्ही. एन. शिंदे,शिवाजी विद्यापीठ,...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अजून किती लुटाल ?

शेतकऱ्यांचे उत्पन्न दसपट झाल्याचा केंद्रीय कृषिमंत्री दावा करतात. परंतु शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना मारण्याचे काम कसे होत आहे हे एका गव्हाचे उदाहरण देऊन सिद्ध करीत...
विश्वाचे आर्त

ज्ञानामुळेच परमात्मा या वस्तूचा अनुभव

देह आणि आत्मा वेगळा आहे. हा अनुभव ज्याला आला तो खरा ज्ञानी. आत्मा हा अमर आहे. नित्य, अविनाशी आहे हे जो जाणतो, तो खरा ज्ञानी....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!