📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 17, 2026
विश्वाचे आर्त

समाधिपाद – योग साधनेतील विघ्ने कोणती ?

obstacles in Yoga And Meditation Samadhipad Sutra

समाधिपाद सूत्र – २९.तत:प्रत्यक्चेतनाधिगमोअपिअंतरायाभावश्च.

ईश्वरप्रणिधानामुळे जीवात्म्याचा साक्षात्कार होतो आणि अनेक विघ्ने नाहीशी होतात. प्रणवाच्या उपासनेमुळे जीवात्म्याचा, अंत:सामर्थ्याचा साक्षात्कार तर होतोच; पण त्याबरोबर जी विघ्ने योगाभ्यासात संकटे निर्माण करू शकतात, ती विघ्ने ही आपोआप नाहीशी होऊ लागतात. 

सूत्र – ३० व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतिभ्रांतिदर्शनालब्धभूमिकानवस्थितत्वानि चित्त विक्षेपास्ते अंतराया:|

या आधीच्या सूत्रात विघ्ने नाहीशी होतात हे सांगितले. पण ती विघ्ने कोणती ?

व्याधी – शारीरिक त्रास.

स्त्यान – काहीच करू नये असे वाटणे. (अंगचोरपणा)

संशय – मी योगाभ्यास करू शकेन की नाही, केला तर योगप्राप्ती होईल की नाही ? असा संशय येणे.

(इथे संशयात्मा विनश्यति हे लक्ष्यात ठेवावे.)

प्रमाद – समाधीच्या साधनांचे अनुष्ठान करण्यात कंटाळा करणे. आलस्य – शरीराला व मनाला जाड्य आल्यामुळे ध्यानात मन रमत नाही.

अविरती – विषयांबद्दल आसक्ती वाढलेली असते, विकारांच्या प्रभावाखाली असल्याने आसक्तीत वाढ होऊन योगाबद्दल कंटाळा येऊ लागतो.

भ्रांतिदर्शन – योगाभ्यास आणि त्याचे फायदे हे सारे खोटे आहे असे वाटणे.

अलब्धभूमिकत्व – समाधी अवस्थेपर्यंत पोचता न येणे.

अनवस्थित्व – समाधीपर्यंत पोचून सुद्धा तिथे चित्तस्थैर्य न झाल्याने ध्येयपूर्तीच्या आधीच समाधीतून बाहेर येणे.

व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा आपल्या कार्यसिद्धीत शारीरिक, मानसिक आणि वैचारिक अडथळे येतच असतात. त्या सर्वांवर मात केल्याशिवाय ध्येयप्राप्ती, संकल्पपूर्ती होत नाही.

लेखन – अ. रा. यार्दी, धारवाड

Related posts

जे मोजदादीपलीकडे आहे, तेच खरे सत्य

अध्यात्म हे शाश्वत सुख देणारे शास्त्र

ध्यान म्हणजे मनाचे स्थिरीकरण नव्हे तर अंतर्बोध

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406