April 30, 2026
मातृस्मृती साहित्य पुरस्कार २०२४ जाहीर. अशोक पवार, डॉ. राजेंद्र माने, किरण भावसार यांच्यासह सात साहित्यिकांचा गौरव. लवकरच पुरस्कार वितरण सोहळा होणार.
Home » राज्यस्तरीय मातृस्मृती साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय मातृस्मृती साहित्य पुरस्कार जाहीर

सांगली – कामेश्वरी साहित्य मंडळ व कामेरी ( ता.वाळवा, जि. सांगली ) येथील स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारे २०२४ चे राज्यस्तरीय मातृस्मृती साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

संस्थेच्या वतीने दरवर्षी साहित्य पुरस्कारासाठी निवेदन पाठवून महाराष्ट्रातून विविध वाड्मय प्रकारातील पुस्तके मागवली जातात. परंतु यावर्षी कोणत्याही वाड्मय प्रकारातील पुस्तके न मागवता पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत.

पुरस्कार निवडीसाठी वाड्मयीन तज्ज्ञ तीन सदस्यीय समिती परीक्षक म्हणून नेमली होती. साहित्य पुरस्कार लवकरच मातृ स्मृती ग्रामीण साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वितरण करण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक दि.‌ बा. पाटील यांनी दिली आहे.

पुरस्कारविजेते व साहित्यकृती अशा –

१) कादंबरी- गावखोरी – अशोक पवार, चंद्रपूर

२) कथासंग्रह- मौनाचं कुलूप – डॉ राजेंद्र माने, सातारा

३) कवितासंग्रह – घामाचे संदर्भ – किरण भावसार, नाशिक

४) ललित गद्य – माती आणि माणसं – प्रा. डॉ. विनय बापट, गोवा

५) चरित्र- ब्रह्मांडनायक, प्रा. संध्या देशपांडे, बेळगांव

६) बालसाहित्य – मातीला पंख फुटताना – डॉ. स्मिता पाटील, मोहोळ
(कथाकार रावजी संताजी शिंदे स्मृती साहित्य पुरस्कार)

७) संकीर्ण – ललकारी – शाहीर शाहिद खेरटकर, चिपळूण
(शीघ्र कवी तमाशा सम्राट नायकू जाधव स्मृती साहित्य पुरस्कार)

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

सुधारित नागरिकत्व कायद्याबाबतच्या शंकाचे निरसर करणारे पुस्तक

मातृमंदिरच्या संत वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

चित्रकार वासुदेव कामत यांना मराठी यशवंत पुरस्कार

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!