शिवाजी सातपुते यांनी गोफणगुंडामध्ये इज्जतीनं वागणं म्हणजे काय रे बाबु असा प्रश्न केला आहे…त्यांनी उठवलेला हा आवाज सरकारला जागे करणारा आहे. तसेच जनतेचेही प्रबोधन करणारा आहे. त्यांची ही कविता वाचा जरूर..
निटला निट झोडणे
तलाठ्याला फोडणे
एमपीएसीचा ताला तोडणे
युपीसीला कोर्टात धाडणे
ईथे स्वच्छ तांदुळसुध्दा बटीक झाला
गुरुही सटीक झाला
चारित्र्यवान श्रीमंत
शिक्षणाचा खाटीक झाला
पैशाचा उनाड घोडा कोण करणार काबु
इज्जतीनं वागणं म्हणजे काय रे बाबु
मतदारांनी मत विकले
गद्दारांचे शेत पीकले
आमदारांनी पक्ष फोडले
ईडीने हात जोडले
चरित्र अन चारित्र्य
राजकारणात झुट आहे
सत्तेच्या गादीवर
हुजर्यांचे पोट आहे
भुकेचे कळ सांग कशी दाबु
इज्जतीनं वागणं म्हणजे काय रे बाबु
कुणबी घाम देतो मातीला
इमाने ईतबारे पीक जगवतो
सार्या विश्वाचा विधाता
कुणबी भुक भागवतो
उसळलेल्या सेंसेक्सवर
इकोनाॅमी सुखी होते
कुणब्यांच्या प्रश्नावर
संसद मुकी होते
निट घुसुन संसदेत कुणाचं नाक दाबु
इज्जतीनं वागणं म्हणजे काय रे बाबु
शिवाजी सातपुते 9075702789


