आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ. माणिकराव खुळे, जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे. ९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
१-कोकणातील मान्सूनची सक्रियता –
मंगळवार दि. २३ जूनपासुन मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मितीची शक्यता असुन तेथे सध्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवते. वेंगुर्ला देवगड हर्णाई ह्या मान्सून पोहोचलेल्या ठिकाणी मान्सूनच्या सरींना चालना मिळू शकते.
२ मुंबईत मान्सून चे आगमन कधी?
मागील २०१९ व २०२३ अश्या एल-निनो च्या गत दोन वर्षात, मुंबईत मान्सूनचे २५ जून ला म्हणजे त्याच्या सरासरी ११ जून ह्या तारखेपासून तब्बल १४ दिवसांनी उशिरा आगमन झाले होते..ह्यावर्षीही एल-निनोचे वर्ष आहे, आणि अद्याप मुंबईत मान्सून पोहोचला नाही. २०२६ च्या एल- निनो वर्षात सुद्धा मान्सूनचे गुरुवार दि. २५ जून ला मुंबईत आगमनाची शक्यता निर्माण झाली आहे.
३- जोरदार मान्सून ची हजेरी मुंबईसह कोकणात कधी?
गुरुवार दि. २५ जून ते बुधवार दि. १ जुलै दरम्यानच्या जुनच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार मान्सूनची शक्यता ही कायम आहे.
४- मुंबईतील दिवसाच्या दमट व रात्रीच्या उकाड्यापासुन मुंबईकरांना दिलासा कधीपासून मिळू शकतो.
शनिवार दि.२० जून पासूनच वातावरण बदलास सुरवात झाली असुन, मुंबईकरांना दिवसाच्या दमटपणा व रात्रीच्या उकाड्यापासुन काहीसा दिलासा मिळू शकतो, असे वाटते.
५- उर्वरित महाराष्ट्रात मान्सून कधी?
मुंबईतील मान्सून च्या आगमनानंतर म्हणजे जुनच्या शेवटच्या आठवड्यात खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर व पश्चिम मराठवाड्यातील जिल्ह्यात मान्सून च्या पावसाची शक्यता जाणवते. पूर्व मराठवाडा व विदर्भात मात्र जुलै पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात मान्सून च्या पावसाची शक्यता तेथे जाणवते. तत्पूर्वी तुरळक ठिकाणी किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता तेथे जाणवतते.
६-मुंबईतील पिण्याच्या पाण्याच्या स्थितीबाबत आज काही भाष्य करता येईल काय?
एल- निनो चे वर्ष व आजपावेतो कोकणात ८१% कमी झालेला पाऊस असे जरी असले तरी मान्सून च्या उर्वरित १२२ दिवसाच्या कालावधीतुन म्हणजे आजपासुन साधारण २० ऑक्टोबर पर्यंत मुंबईसह कोकणात मान्सून च्या पावसातुन मुंबईतील तळी व धरणांचे असलेले जाळे ह्यातून मुंबईकरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटू शकते, असे वाटते.
