वर्धा – येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने पाच साहित्य पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे यांनी दिली आहे.
राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार, उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार, उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार, उत्कृष्ट लेखिका पुरस्कार असे पाच पुरस्कार मारोतराव नारायणे प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणार असून या प्रत्येक पुरस्कारासाठी ६,००० रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तरी साहित्यिकांनी ०१ फेब्रुवारी २०२५ ते २० फेब्रुवारी २०२६ या काळात प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्तीच्या तीन प्रती प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, अध्यक्ष, मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान, शाहू ले आऊट, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयाजवळ, वर्धा ४४२००१ या पत्त्यावर २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पाठवाव्या.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध समीक्षकांच्या मार्फत साहित्यांचे परीक्षण करण्यात येणार असून २५ मार्च २०२६ रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. तसेच २५ एप्रिल २०२६ रोजी मारोतराव नारायणे यांच्या स्मृतिदिनानिमित्य वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात या पाचही पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मारोतराव नारायणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, वर्धा ९८५०३०९६६५, सचिव हेमलता नारायणे, वर्धा ९०११८७८४८९, पुरस्कार संयोजन समिती सदस्य श्रीकांत पेटकर, कल्याण ९७६९२१३९१३, किशोर पेटकर, नागपूर ८८०६२४७६८६, डॉ. संदीप भेले, बदलापूर ९८८१४२२४५३, सूर्यकांत पाटील, वरोरा ९४२२१९१५२४ यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
