June 2, 2026
Home » ते आलेच
कविता

ते आलेच

They Come Shripal Bhalchandra joshi Poem

ते आलेच
पसरलेही बघता बघता
स्थिरावलेही
बरेचसे

दृष्टी त्यांची,
विचार त्यांचा,
आकर्षक
रांगोळ्या त्यांच्या
काढणारे
हात त्यांचे

चालणारे,
चालवले जाणारे,
डोके तेवढे नाही
त्यांचे

ही तर
आयुधे, सामुग्री त्यांची
त्यांच्या पालकांची,
पोषिद्यांची

लाख मरोत,
पण पोषिंदा जगो
अशी एक
म्हण आहे

संस्कार आहे लोकांवर
तिचा
जगत जगत लाखो
तसेच दाखवतात प्रत्यक्षात मरून, लोक
त्यांच्यावरील प्रभाव
तिचा

त्याच्याच बाजूने
उभे राहिले पाहिजे
असे आता
तथाकथित पत्रपंडितही
सांगू लागले आहेत

पापी नव्हेत ते
पुण्यवानच कसे आहेत
ते समजावून
सांगू लागले आहेत

देईल जे
भरभरून,
पीक त्याचेच
तेवढे आणले
पाहिजे म्हणतात
सरसरून

आवळा देऊन
कोहळा काढणे म्हणजे
काय,
म्हणींचा असतो
अर्थ
कळतो तरी
काय?

अभ्यासक्रमच सारे
बदलून झाल्यावर,
हे
कळणार तरी
कसे काय?

- श्रीपाद भालचंद्र जोशी

Related posts

कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?

बिघडलेला बाजार

आळशी बनवण्याचा धंदा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!