fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 14, 2026
Home » दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २०२५ चे ग्रंथ पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २०२५ चे ग्रंथ पुरस्कार जाहीर

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०२५ ग्रंथ पुरस्कारासाठी निवड झालेल्या साहित्यिकांची घोषणा

रवींद्र ठाकूर, रमेश साळुंखे, निलांबरी कुलकर्णी, शशिकांत चौधरी आदी साहित्यिकांचा गौरव

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या वतीने देण्यात येणारे २०२५ मधील विविध ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रवींद्र ठाकूर, रमेश साळुंखे, शशिकांत चौधरी, निलांबरी कुलकर्णी, चंद्रकांत बाबर यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण समारंभ रविवारी, २४ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सभेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली.

पुरस्कार प्राप्त साहित्यकृती अशा

१) देवदत्त पाटील पुरस्कार (कादंबरी विभागून)
धरणीमाय — शशिकांत चौधरी
भिंगुळवाणे दिवस — रमेश साळुंखे

२) शंकर खंडू पाटील पुरस्कार (स्त्रीप्रधान कथासंग्रह)
सर्वेपि सुखिन सन्तु — निलांबरी कुलकर्णी

३) अण्णाभाऊ साठे पुरस्कार (कादंबरी)
दाही दिशा — रवींद्र ठाकूर

४) कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार (संकीर्ण)
महामुद्रा — धनंजय बिजले

५) शैला सायनाकर पुरस्कार (कवितासंग्रह)
माझ्यातल्या कवितेची हळूहळू होऊ लागली आहे वाफ — चंद्रकांत बाबर

६) चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन)
घुंगुरमाळा — महानंदा मोहिते

७) बालवाङ्मय पुरस्कार
श्री संवाद — श्रीयांश हराडे

विशेष पुरस्कार प्राप्त साहित्यकृती अशा –

थिजलेल्या माणुसकीचा गहिवर — सोनिया पाटील
कर्तृत्वाचा एक शोध — रवींद्र बेडकीहाळ
गुलामी जिणं — रमेश जावीर
जगाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज — मधुकर जाधव
चलबट — अर्जुन व्हटकर
राजधुरंदर ताराराणी — राजेंद्र घाडगे
अर्थतरंग — संजय ठिगळे
कोलाहालची क्षणचित्रे — लवकुमार मुळे
फक्कड — सचिन अवघडे
घनघोर काळीजभर — रवी बावडेकर
तू ही गोष्ट सांगायला नको होती — सुनील साळुंके
वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन — सिद्धार्थ कांबळे
मी चंदन व्हाया बघतो — सुधाकर इनामदार
स्त्री क्षेत्र ऋतुक्षेत्र अम्बुबीजानाम् — दिपाली घाडगे
अंतरंग शब्दाचे — संजय वारके
निळी सावळी नव्हाळी — स्वाती पाटील
सायतारे — प्रकाश कुलकर्णी
काठावरच्या चेहऱ्यांच्या कथा — सुरज चौगुले
महात्मा बसवेश्वर आणि संत ज्ञानेश्वर यांचे सामाजिक चिंतन — चारुदत्त कासार

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसेच सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे दरवर्षी सन्मानित करण्यात येते. २०२५ च्या ग्रंथ पुरस्कारांसाठी भीमराव धुळूबुळू, प्रा. दि. बा. पाटील, गौरी भोगले आणि पाटलोबा पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Related posts

अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

साताऱ्यातील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर

महाराष्ट्रातील बदललेली शेती…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!