चितळे ग्रुप आता जगभरात विस्तारतो आहे. मिठाईचे पॅकेंजिंग आणि ती साठवायची कशी हे मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत चितळे ग्रुपने त्यांची उत्पादने जगभरात पाठवली आहेत. काय आहे त्यांच्या यशाचे गमक ? शेतकऱ्यांच्यापासून त्यांची सुरुवात होते आणि ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करायला लागतो ? त्याचे व्यवस्थापन ते कसे करतात ? उत्पादनांची विक्री करताना कोणते मुद्दे ते विचारात घेतात ? स्टोरी टेलिंग अॅड करण्यामागे त्यांचा हेतू काय आहे ? आज चितळ्यांची चौथी पिढी या व्यवसायात आहे. व्यवसायात हा वारसा त्यांनी कायम ठेवला आहे. तो ठेवणे त्यांना कसे शक्य झाले आहे ? त्यांनी हा वारसा कसा जपला आहे ? व्यवसायामध्ये नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांना ते कोणता सल्ला देऊ इच्छितात ? अशा विविध मुद्द्यावर इंद्रनिल चितळे यांच्याशी विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनचे डॉ. प्रशांत अगरवाल यांनी केलेली बातचित…
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
