fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 23, 2026
Home » Monsoon Updates : मान्सून पुढे सरकला !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Monsoon Updates : मान्सून पुढे सरकला !

The southwest monsoon has resumed its advance across Maharashtra after a 14-day pause. Mumbai and the remaining regions are likely to receive monsoon rains within the next few days.
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

१- मान्सून कुठपर्यंत पुढे सरकला ?   

मान्सून ने  १४ दिवसाच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुढे काहीशी प्रगती केली आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्हा ओलांडून रायगड जिल्ह्याच्या अलिबागपर्यन्त तर मध्य महाराष्ट्रात सातारा सोलापूर जिल्हे ओलांडून पुणे जिल्ह्यात मावळ मुळशी पुणे पर्यन्त तसेच दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा कर्जत जामखेडपर्यन्त आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्याचा बराचसा भाग व्यापत मान्सून ने पुढे वाटचाल केली.  त्याचबरोबर मान्सून च्या ह्याच अरबी समुद्रीय शाखेनेच  तेलंगणा राज्यातून मान्सून दक्षिण विदर्भातील गडचिरोलीतील ‘ सिरोंचा ‘ तालुक्याच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन ठेपला आहे.

२- मान्सून मुंबईत कधी?

मान्सून पोहोचलेल्या या सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली नसली तरी मान्सून चे वारे तेथपर्यंत पोहोचले आहेत.  मान्सूनच्या पुढील आगमनासाठी वातावरण अनुकूल असुन येत्या २-३ दिवसात मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पुढे झेपावेल, असे वाटते.

३-कश्यामुळे मान्सून पुढे सरकला?

पावसाळी हंगामात समुद्रसपाटी च्या पातळीत स्थिरावणारा हवेच्या कमी दाबाचा पुर्वो-पश्चिम आस काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. आज तो पंजाब हरियाणा  ऐवजी  राजस्थान बिहार उत्तरप्रदेश राज्यातून पास होत आहे. तसेच वायव्येकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. अरबी समुद्रात साडे तीन ते पावणेचार किमी. दरम्यान असणाऱ्या प्रत्यावर्ती वाऱ्याच्या प्रणाली विरळतेकडे गेली आहे. त्यामुळे मान्सूनी वाऱ्यांना बळकटी मिळाली असून महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल झाली आहे.

४-सध्याची उष्णतेची लाट व रात्रीचा उकाडा?

आजपासून पुढील ४ दिवस म्हणजे शुक्रवार दि. २६ जूनपर्यंत विदर्भात भाग बदलत उष्णतेची तीव्र लाट तसेच रात्रीच्या उकाडा जाणवेल, असे वाटते.

Related posts

ज्वारीचे भूत, भविष्य आणि वर्तमान

कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर भात रोपवाटिकेची अशी घ्या विशेष काळजी .. Agricultural advice in the face of low rainfall

उसात मूग, जमिनीत कर्ब : शाश्वत शेतीचा यशस्वी प्रयोग

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!