fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 4, 2026
Home » उन्हाळी तीळ लागवड तंत्रज्ञान
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उन्हाळी तीळ लागवड तंत्रज्ञान

Farmer cultivating sesame crop in field – Phule Purna sesame farming in Maharashtra

उन्हाळी तीळ लागवडीचे अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या टीप्स विचारात घ्याव्यात…

डॉ. सुमेरसिंग राजपूत, तीळ पैदासकार
अखिल भारतीय समन्वित तीळ सुधार प्रकल्प,
तेलबिया संशोधन केंद्र,जळगाव-४२५००१

महाराष्ट्र राज्यात मागील दोन वर्षापासून शेतकरी उन्हाळी तिळ लागवडीकडे वळला असून मोठ्या क्षेत्रात तिळ पिक उन्हाळी हंगामात घेत आहे. शासनाच्या तेलबियाअभियान ( oilseed mission ) अंतर्गत तिळ पिकाचे बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी उन्हाळी हंगामासाठी वर्ष २०२३ मध्ये फुले पूर्णा नावाची तिळ पिकाची जात विकसित करून केंद्रीय जात समिती द्वारा लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

फुले पूर्णा तिळ पिकाच्या जातीला महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश ह्या राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात केळी पिकात आंतरपीक म्हणून तिळ पिकाची ठिंबक वर लागवड करीत आहे, मागील वर्षी शेतकरी वर्गास केळी मध्ये आंतरपीक म्हणुन तिळ पिकाचे उत्पादन अधिक मिळाले आहे. शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनासाठी लागवडीच्या पुढील सूत्राचा अवलंब करावा.

तीळ पिकाचे महत्व –
१.प्राचिन काळातील सर्वात प्रथम तीळ तेलबिया पिकाचा शोध लागला
२.खाद्यतेल म्हणून सर्वात उपयोगी
3. सर्वात कमी असंपृक्त मेदाम्ले( लिनोलेईक) असल्याने मानवी शरीरात कोलेस्टेरोल पातळी करणेस मदत करते म्हणजे हृदयरोगावर अतिशय गुणकारी आहे.
४. सांधेदुखीवर नियंत्रण करणेकरिता उत्तम
५.तीळ तेलात सिसामीन आणि सिसामोल हे दोन महत्वाचे घटक असलेने आयुर्वेदात तीळ पिकास अनन्यसाधारण महत्व आहे.

    नव्याने तीळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या काही गोष्टी :

    Ø जमीन : जमीन खोल नांगरून तयार करावी.
    Ø शेणखत : ५ टन/हेक्टरी जमिनीत टाकावे.
    Ø जमीन भुसभुशीत करून फळी मारून सपाट करावी.
    Ø पेरणी : पेरणी बैल पाभरीने करावी.
    Ø बियाणे पेरणीची खोली : जमिनीत २.५ सेंटीमीटर खोली इतक्या खोलीवर बियाणे पेरावे.
    Ø जमिनीत २.५ सेंटीमीटर खोली पेक्षा जास्त खोलीवर टाकल्यास बियाणे उगवत नाही.म्हणून पेरणी करतांना योग्य ती काळजी घावी.
    Ø tractor ने पेरणी करू नये.कारण tractor ला लावलेल्या पाभरीने बियाणे २.५ सेंटीमीटर खोलीवर न पडता त्याहून अधिक खोलीवर पडून पुढे उगवनक्षमता अतिशय कमी होते.म्हणून tractor ने पेरणी करणे टाळावे.
    Ø वाळलेल्या शेणाच्या गोवऱ्या कुटून बारीक पावडर तयार करून चाळणीने गाळून घ्यावी. ह्या पावडर मध्ये तीळ बियाणे एकत्रित करून पाभरीने पेरणी करावी.
    Ø साधारणपणे १ किलो बियाणात ५ किलो गोवऱ्या कुटलेली पावडर एकत्रित करून पाभरीने पेरणी करावी.
    Ø पेरणी अंतर : ४५ x १० सेंटीमीटर अंतरावर करावी.
    Ø बियाणे : २.५ किलो/हेक्टर तीळ बियाणे वापरावे
    Ø सुधारित जाती : फुले पूर्णा, जे.एल.टी. ४०८, फुले तीळ न.१,एकेटी-१०१,NT-11, G-1
    Ø पेरणीची वेळ : १५ जून ते १५ जुलै
    Ø खत व्यस्थापन : ५० किलो नत्र/हेक्टरी विभागून द्यावा.
    Ø पहिला नत्राचा हप्ता : २५ किलो नत्र/हेक्टरी पेरणीचे वेळी द्यावा.
    Ø दुसरा नत्राचा हप्ता : २५ किलो नत्र/हेक्टरी पिक ३० दिवसाचे पिक झाल्यानंतर द्यावा.
    Ø जमिनीत पुरेसा ओलावा असतांना पेरणी करावी.
    Ø तीळ हे पिक जास्त पाण्याला अतिशय संवेदनशील असलेने दलदल असलेल्या भागात पेरणी करू नये.
    Ø विरळणी : पिक उगवण झाल्यानंतर पहिली विरळणी १५ दिवसांनी करावी. दुसरी विरळणी ३० दिवसांनी करावी.
    Ø पिक संरक्षण : तीळ पिकावर पाने कुरतडणारी अळीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास क्विनोल्फोस १मिली.प्रती लिटर पाणी या प्रमाणे पिकावर फवारणी करावी.
    Ø कोळपणी : पेरणीचे अंतर ४५ x १० सेंटीमीटर असलेने बैल कोळप्याने पहिली कोळपणी पिक ३० दिवसाचे असतांना करावी.
    Ø प्रथम निंदनी : पिक ३० दिवसाचे असतांना करावी.
    Ø दुसरी कोळपणी : ४५ दिवसांनी करावी.
    Ø दुसरी निंदनी : तण तीव्रता बघून पिक ६० दिवसाचे असतांना दुसरी निंदनी करावी.
    Ø पिक काढणी : साधारणपणे तिळाच्या बोन्ड्या पिवळसर झाल्याने कापणी करावी.
    Ø कापणी केल्यावर पेंढ्या बांधून त्यांच्या खोपड्या करून वाळवाव्यात.
    Ø साधारणपणे काढणीनंतर १० ते १५ दिवस पेंढ्या वाळवाव्यात.त्यानंतर जागेवरच तीळ बियाणे पेंढ्या उलट्या करून झटकून घ्यावे.
    Ø उत्पन्न : ७ ते ८ क्विंटल/हेक्टरी.

    Related posts

    बळीराजाचं ‘बाटुक’ आयुष्य — कवितेतून उमटलेली जिव्हारी लागणारी वेदना

    मिरची सुधारित लागवड तंत्रज्ञान

    स्त्रियांनी जपलेली जैविक विविधता…

    Leave a Comment

    Leave a review

    श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
    error: Content is protected !!