May 11, 2026
Chance of hail in ten districts of Madhya Maharashtra
Home » मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात गारपीटीची शक्यता
काय चाललयं अवतीभवती

मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात गारपीटीची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात गारपीटीची शक्यता

ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील  पावसाचे दि. २३ ऑक्टोबरपर्यंतच्या सात दिवसा (१७ ते २३ ऑक्टोबर) दरम्यानचे दुसऱ्या आवर्तनात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस होत असुन बुधवार दि. २३ ऑक्टोबर पर्यन्त ह्या पावसाची शक्यता कायम आहे.

विशेष. म्हणजे शनिवार ( दि. १९ ऑक्टोबर) पासून पुढील दोन दिवस म्हणजे १९ ते २० ऑक्टोबर (शनिवार- रविवार) दरम्यान खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

गारपीटीची शक्यता कशामुळे निर्माण झाली ?

रत्नागिरी जिल्ह्याच्या समोर खोल अरबी समुद्रात व थायलंडच्या पश्चिम किनारपट्टीसमोर बंगालच्या उपसागरातील दोन्हीही समुद्रातील चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीतून सह्याद्रीच्या पूर्व बाजूला संपूर्ण मध्य महाराष्ट्रादरम्यान होणारा वाऱ्यांचा संयोग तसेच मध्य तपांबरात म्हणजे समुद्र सपाटीपासून ५.८ किमी. उंचावर तयार झालेला ‘ व्हर्टिकल विंड शिअर ‘ (एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या असमान वेगवान वाऱ्याचा व्हर्टिकल शिअर झोन).

मध्य तपांबरात म्हणजे समुद्र सपाटीपासून ५.८ किमी. उंचावर, उत्तर दिशेकडून २० डिग्री अक्षवृत्त दक्षिणे पर्यंत पर्यन्त सरकलेले बळकट पश्चिमी वारे ह्या वातावरणीय घडामोडीमुळे गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

चौथ्या समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रफुल्ल शिलेदार

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!