May 13, 2026
literature-award-by-swagat-foundation-satara-district
Home » स्वागत फाऊंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

स्वागत फाऊंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सातारा – जिल्ह्यातील स्वागत फाऊंडेशनतर्फे कै. शामराव भिसे (गुरुजी) राज्यस्तरीय वाड्मयीन पुरस्कार २०२२ साठी विविध साहित्य प्रकारातील साहित्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. यासाठी
कथा, कविता, कादंबरी, नाटक, समिक्षा, बालसाहित्य, ललित, वैचारिक आणि इतर सर्व साहित्य प्रकारातील साहित्य मागविण्यात येत आहे, अशी माहिती सूर्यकांत शामराव भिसे यांनी दिली आहे.

या पुरस्कारासाठी जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या दोन वर्षात प्रकाशित झालेले साहित्य ग्राह्य धरले जाणार आहे. पुरस्कारांची घोषणा फेब्रुवारीमध्ये करण्यात येतील व पाटण येथे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असेल, असे श्री भिसे यांनी सांगितले.

पुस्तकाच्या दोन प्रती, लेखकाचा अल्प परिचय आणि पासपोर्ट साईज दोन फोटो १५ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा रितीने स्वागत फाऊंडेशन, सूर्यकांत शामराव भिसे, मु, सातेवाडी, पो. नाटोशी, ता. पाटण जि. सातारा. पिन- 415206 संपर्क – 9881360334, 9890550962 यावर पाठवण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

विविध भाषातील २३ युवा लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या जाहीराती

हिवाळ्यासाठी सुपरफुड…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!