fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 29, 2026
Home » ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनाची गाळे नोंदणी ५ नोव्हेंबरपासून सुरु
काय चाललयं अवतीभवती

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनाची गाळे नोंदणी ५ नोव्हेंबरपासून सुरु

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाच्या गाळ्यांची नोंदणी ५ नोव्हेंबरपासून सुरू. हे भव्य संमेलन १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान साताऱ्यात होणार आहे.

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाची गाळे नोंदणी ५ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे, अशी माहिती अखिल भारतीय महामंडळाच्या कार्यवाह आणि ग्रंथप्रदर्शनाच्या प्रमुख सुनिताराजे पवार यांनी दिली आहे.

सातारा येथे तब्बल ३२ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन वैशिष्टयपूर्ण आणि साताऱ्याच्या लौकिकाला साजेसे असे होईल. साताऱ्यात वाचन संस्कृती रुजली आहे. जिल्ह्याला मोठी साहित्यिक परंपरा आहे. हे संमेलन सातारा बसस्थानकाच्या शेजारीच असणाऱ्या भव्य अशा शाहू स्टेडीअमवर होणार आहे. या संमेलनात प्रथमच चार दिवस ग्रंथ प्रदर्शन होणार असून ही वाचकांसाठी पर्वणी आहे.

संमेलनात एकूण गाळ्यांची संख्या २४० असेल. गाळ्याचा आकार ९ x ९ फूट असा आहे. गाळ्यामध्ये २ टेबल, २ खुर्च्या, वीजेची सुविधा उपलब्ध असेल. गाळ्याचे शुल्क प्रत्येकी ८००० + १४४० जीएसटी असे एकूण ९९४० रुपये आहे. प्रति गाळा एका व्यक्तीसाठी निवास, भोजन, चहा, नाष्टा याचा या शुल्कात समावेश आहे. आजवर संमेलनात एका संस्थेला केवळ चारच गाळ्यांची नोंदणी करता येत होती. यंदा एका संस्थेला जास्तीत जास्त ६ गाळ्यांची नोंदणी करता येईल. गाळ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. त्याची लिंक https://tender.abmsssatara.org/gala-nondani अशी आहे. गाळ्यांचे वाटप सोडत पद्धतीने होईल. गाळा नोंदणी ५ नोव्हेंबरपासून सुरु होईल, असेही पवार यांनी सांगितले.

Related posts

मातृमंदिरतर्फे संत वाड्.मयविषयक पुरस्कारासाठी आवाहन

वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!