May 3, 2026
Approval to set up ten nuclear reactors in the country
Home » देशात दहा अणुभट्ट्या उभारण्यासाठी मंजुरी
काय चाललयं अवतीभवती

देशात दहा अणुभट्ट्या उभारण्यासाठी मंजुरी

देशात दहा अणुभट्ट्या उभारण्यासाठी मंजुरी दिल्याची माहिती केंद्र सरकारने दिली

नवी दिल्‍ली – नासा अर्थात राष्ट्रीय विमानोड्डाण तंत्रज्ञान आणि अवकाश प्रशासन विषयक संस्था आणि इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संघटना यांनी संयुक्तपणे निसार (नासा-इस्रो सिंथेटिक अॅपर्चर रडार) नामक भूविज्ञान उपग्रहाची निर्मिती केली आहे अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयातील तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन आणि अणुउर्जा तसेच अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत उपस्थित सदस्यांना दिली.

देशभरात दहा अणुभट्ट्यांची उभारणी करण्यासाठी मंजुरी दिली आहे अशी माहिती केंद्र सरकारने दिली.

लोकसभेत पटलावर ठेवलेल्या निवेदनाद्वारे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयातील तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन आणि अणुउर्जा तसेच अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की सरकारने अणुभट्ट्या उभारण्याच्या कामासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची मदत घेतली आहे किंवा काही ठिकाणी हे काम केवळ विशेष सरकारी संस्थांच्या मार्फत करून घेतले जाणार आहे. सरकारने देशात प्रत्येकी 700 मेगावॉट क्षमतेच्या दहा प्रेशराईज्ड हेवी वॉटर अणुभट्ट्या उभारण्यासाठीच्या प्रशासकीय परवानग्या आणि आर्थिक मान्यता दिल्या आहेत.

यासंदर्भातील तपशील तक्त्यात दिला आहे:

StateLocationProjectCapacity  (MW)
KarnatakaKaigaKaiga-5&62 X 700
HaryanaGorakhpurGHAVP– 3&42 X 700
Madhya PradeshChutkaChutka-1&22 X 700
RajasthanMahi BanswaraMahi Banswara-1&22 X 700
Mahi Banswara-3&42 X 700

अणुउर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी एनपीसीआयएल अर्थात भारतीय अणुउर्जा महामंडळ आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांच्या सहभागातून निर्मित संयुक्त उपक्रमांची मदत घेता यावी यासाठी केंद्र सरकारने वर्ष 2015 मध्ये अणुउर्जा कायद्यात सुधारणा केली आहे.

या अणुभट्ट्यांची उभारणी वर्ष 2031 पर्यंत उत्तरोत्तर अधिक वेगवान पद्धतीने करण्याचे नियोजित केले असून यासाठी 1,05,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित

पंढरपूरच्या श्री रूक्मिणीमातेची दुर्गादेवीच्या रुपात पुजा

म.सा.प. इस्लामपूरतर्फे दिवाळी अंक स्पर्धा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!