📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 12, 2026
काय चाललयं अवतीभवती

Weather Forecast : पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता

Weather Forecast Chance of rain along with hailstorm

शुक्रवार दि.२४ नोव्हेंबर २०२३

      ‘ पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता ‘

गुरुवार (ता. २३)पासून सुरु झालेल्या २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यानच्या पाच  दिवसीय पावसाळी वातावरणापैकी रविवार व सोमवार (ता.२६ व २७ नोव्हेंबरला) नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची तीव्रताअधिक असुन तेथे तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बुधवार (ता. २९ नोव्हेंबर) पासून वातावरण निवळून त्यापुढील ३ आठवड्यापर्यंत दुपारच्या कमाल तापमानात घट जाणवून दिवसाचा ऊबदारपणा कमी होवून दिवसाही काहीसा गारवा जाणवू शकतो. तर शुक्रवार ८ डिसेंबर पासून किमान तापमानताही हळूहळू घसरण होवून  थंडीला सुरवात होवु शकते असे वाटते
               
गारपिटीचा काळ नसतांनाही, सध्या गारपीटीची शक्यता का निर्माण झाली ?

खरं तर गारपीटीचा काळ साधारण २६ जानेवारी ते १५ मार्च पर्यन्त जाणवतो. तरीदेखील पाच जिल्ह्यात २ दिवस तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे. त्याची कारणे अशी..

(i) अरबी समुद्रात मालदीव ते उत्तर महाराष्ट्र पर्यन्त पश्चिम किनारपट्टी समांतर पृष्ठभागापासून दिड किमी. उंचीच्या जाडीचा हवेच्या कमी दाबाच्या ‘ आस ‘ निर्मिती मुळे –
(ii)वायव्य उत्तर भारतातुन थेट मध्य प्रदेश, गुजराथ मधून उत्तर महाराष्ट्रापर्यन्त तसेच तेथून दक्षिण कोकण किनारपट्टीसमोर अरबी समुद्रात  ६ किमी. उंचीच्या वर निर्मित हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावाताचा परिणामामुळे –
(iii)  तामिळनाडू, केरळ भू -भाग ओलांडून दिड ते दोन किमी. उंचीपर्यंतची ‘पुरवी ‘ वारा प्रणाली अरबी समुद्रात उतरून विकसित होवून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करून वरील पश्चिमी झंजावात प्रणालीत होणाऱ्या विलीनिकरणामुळे दोन(ii व iii ) प्रणल्याच्या संयोगातून गारपीटीची शक्यता वाढली आहे.

Related posts

गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर

शुक्रवारी रात्री पाहायला मिळणार उल्कावर्षावाचा सुंदर नजारा

गारगोटीच्या अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय पुरस्कार 2024 जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406