April 29, 2026
Unseasonal Weather Conditions Expected in Maharashtra from March 29 to April 7, 2025
Home » महाराष्ट्रात दहा दिवस अवकाळीचे वातावरण
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात दहा दिवस अवकाळीचे वातावरण

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

‘एमजेओ’ ची सायकल, अद्याप भारत महासागरीय परीक्षेत्रात प्रवेशली नसला तरी, बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे पण भूभागावर महाराष्ट्रपर्यंत येताच नैऋक्तकडून ईशान्येकडे दिशा घेणारे तसेच उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे ईशान्येकडून नैऋक्तकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे ह्यांच्या संगमातून व त्यातून समुद्रसपाटीपासून ९०० मीटर ऊंचीपर्यन्त महाराष्ट्र ते ओरिसाराज्या दरम्यान तयार झालेला कमकुवत हवेच्या कमी दाबाचा आस ह्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवडयात इतर राज्याबरोबर महाराष्ट्रातही अवकाळीचे वातावरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ह्याच्या परिणामातून आजपासून दहा दिवस म्हणजे सोमवार दि. ७ एप्रिलपर्यन्त महाराष्ट्रात ढगाळ तसेच गडगडाटीचे वातावरण राहण्याची शक्यता असून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही जाणवते. विशेषत: मंगळवार व बुधवार दि. १ व २ एप्रिलला ह्या वातावरणाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता असल्यामुळे ह्या दोन दिवसात महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे वाटते.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

कृषी क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत सरासरी वार्षिक वाढीचा दर 4.18 टक्के – आर्थिक पाहाणी अहवाल

केसांची गळती थांबवण्यासाठी करा हा उपाय…

नदी प्रदुषणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!