आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ
माणिकराव खुळे
मोबाईल – 9423217495
‘उद्यापासून चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !’
उद्या गुरुवार ( दि १ ऑगस्ट) पासून रविवार (दि. ४ ऑगस्ट) पर्यन्तच्या चार दिवसात महाराष्ट्रात पुन्हा भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः ३ व ४ ऑगस्टला (शनिवार – रविवारी) पावसाचा जोर अधिक असू शकतो. आतापर्यंत ओढ दिलेल्या पर्जन्यच्छायेतील प्रदेशातही समाधानकारक पावसाची अपेक्षा करू या !
चार दिवसातील जिल्हावार पावसाची तीव्रता अशी असू शकते…
अति जोरदार – १४ जिल्हे
मुंबईशहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
जोरदार – १६ जिल्हे
नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली , नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा
मध्यम ते जोरदार- ६ जिल्हे
सांगली, सोलापूर, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम
सोमवार (दि. ५ ऑगस्ट) अमावस्येपासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पूर्ण नव्हे पण काहीसा पावसाचा जोर कमी होवू शकतो.
माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
Meteorologist (Retd)
