आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ
माणिकराव खुळे
मोबाईल – 9423217495
‘उद्यापासून चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !’
उद्या गुरुवार ( दि १ ऑगस्ट) पासून रविवार (दि. ४ ऑगस्ट) पर्यन्तच्या चार दिवसात महाराष्ट्रात पुन्हा भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः ३ व ४ ऑगस्टला (शनिवार – रविवारी) पावसाचा जोर अधिक असू शकतो. आतापर्यंत ओढ दिलेल्या पर्जन्यच्छायेतील प्रदेशातही समाधानकारक पावसाची अपेक्षा करू या !
चार दिवसातील जिल्हावार पावसाची तीव्रता अशी असू शकते…
अति जोरदार – १४ जिल्हे
मुंबईशहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
जोरदार – १६ जिल्हे
नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली , नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा
मध्यम ते जोरदार- ६ जिल्हे
सांगली, सोलापूर, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम
सोमवार (दि. ५ ऑगस्ट) अमावस्येपासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पूर्ण नव्हे पण काहीसा पावसाचा जोर कमी होवू शकतो.
माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
Meteorologist (Retd)
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
