📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 9, 2026
काय चाललयं अवतीभवती

डिजिटल इंडिया भाषिणी Digital India Bhashini आणि काठमांडू विद्यापीठ Kathmandu University यांच्यात ‘व्हॉइस फर्स्ट’ या नेपाळसाठीच्या भाषांतर मंचासाठी सामंजस्य करार

डिजिटल इंडिया भाषिणी आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात नेपाळसाठी ‘व्हॉइस फर्स्ट’ बहुभाषिक भाषांतर मंच विकसित करण्यासाठी सामंजस्य करार झाला.

नवी दिल्ली ः भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने नेपाळमधील काठमांडू विद्यापीठाच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रासोबत भाषा कृत्रिम बुद्धिमत्ता, बहुभाषिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक डिजिटल परिसंस्था विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

या सामंजस्य करारावर डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग आणि काठमांडू विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. बालकृष्ण बाल यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या कराराची देवाणघेवाण भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खानाल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान करण्यात आली. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक डिजिटल परिवर्तन या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या भारत आणि नेपाळच्या सामाईक वचनबद्धतेचे या प्रसंगी दर्शन घडले.

या सामंजस्य कराराअंतर्गत दोन्ही संस्था उच्च दर्जाचे नेपाळी भाषेचे माहितीसंच, ध्वनी माहितीसंच आणि बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता संसाधने विकसित करण्यासाठी सहकार्य करणार आहेत. यामध्ये भाषण ते मजकूर (स्पीच-टू-टेक्स्ट), मजकूर ते भाषण (टेक्स्ट-टू-स्पीच), यंत्राधारित भाषांतर (मशीन ट्रान्सलेशन) तसेच बहुभाषिक संवादक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमतांचा समावेश असेल.

ही भागीदारी भारत-नेपाळ क्षेत्रातील अल्पसंसाधित आणि दुर्लक्षित भाषांचा भाषिक व साहित्यिक वारसा जतन आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठीही सहाय्य करेल. डिजिटल युगात अस्तित्वाच्या धोक्याला सामोरे जाणाऱ्या भाषिक समुदायांना त्यांच्या मातृभाषेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने आणि सेवा उपलब्ध करून देण्यावर या उपक्रमात विशेष भर दिला जाणार आहे.

या भागीदारीमुळे नेपाळमधील नागरिक, विद्यार्थी, उद्योजक आणि व्यावसायिक यांच्यासाठी नवीन आर्थिक आणि सामाजिक संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. शिक्षण, कौशल्यविकास, डिजिटल व्यापार आणि सार्वजनिक सेवांमध्ये बहुभाषिक प्रवेश सुलभ होऊन नेपाळ तसेच प्रादेशिक आणि जागतिक बाजारपेठांमध्ये अधिक संधी उपलब्ध होतील.

Related posts

विठ्ठल..विठ्ठल..विठ्ठल… (व्हिडिओ)

राज्यस्तरीय मातृस्मृती साहित्य पुरस्कार जाहीर

मराठी माणसांच्या आकलनाचा परीघ विस्तारणारी कविता ‘बाया पाण्याशीच बोलतात’

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406