May 29, 2026
Home » उद्यापासून चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !
काय चाललयं अवतीभवती

उद्यापासून चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !

possibility that the intensity of rain will increase in Maharashtra for four days from tomorrow

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ

‘उद्यापासून चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !’

उद्या गुरुवार ( दि १ ऑगस्ट) पासून रविवार (दि. ४ ऑगस्ट) पर्यन्तच्या चार दिवसात महाराष्ट्रात पुन्हा भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः ३ व ४ ऑगस्टला (शनिवार – रविवारी) पावसाचा जोर अधिक असू शकतो. आतापर्यंत ओढ दिलेल्या पर्जन्यच्छायेतील प्रदेशातही समाधानकारक पावसाची अपेक्षा करू या !

चार दिवसातील जिल्हावार पावसाची तीव्रता अशी असू शकते…

अति जोरदार – १४ जिल्हे
मुंबईशहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर

जोरदार – १६ जिल्हे
नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली , नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा

मध्यम ते जोरदार- ६ जिल्हे
सांगली, सोलापूर, धाराशिव, बुलढाणा, अकोला,  वाशिम

सोमवार (दि. ५ ऑगस्ट) अमावस्येपासून  कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पूर्ण नव्हे पण काहीसा पावसाचा जोर कमी होवू शकतो.

माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
Meteorologist (Retd)

Related posts

संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य – रमेश वरखेडे

कोरोनाला हरवण्यासाठी मुलभूत गरजांचा सप्तकोन

साहित्यिक पांडूरंग कुंभार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!