बहुआयामी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा वेध घेताना त्यांच्या पेन आणि पुस्तकांवरील अपार प्रेमाची प्रेरणादायी कहाणी आपणासमोर मांडावी असे वाटले. ज्ञानाला शस्त्र मानून आयुष्य घडवणाऱ्या या महामानवाने दिलेला संदेश आजही प्रत्येक पिढीला विचार करायला भाग पाडतो.लहू गायकवाड, नारायणगांव
गौतम बुद्ध मूळ नाव सिद्धार्थ. बुद्ध याचा अर्थ शांतता. वैदिक संस्कृतीमध्ये शांततेच्या सर्वोच्च पदाला पोहोचलेल्या व्यक्तीला ब्रह्मास्मि असे म्हणतात. ख्रिस्ती धर्मामध्ये ख्रिस्त म्हणजे शांतता. इस्लाम धर्मामध्ये इस्लाम म्हणजे शांतता. जगातील सगळ्या धर्मांना हवी आहे ती शांतता आणि त्या धर्मात नांदणाऱ्या लोकांना नको झालेली शांतता. हे तर हे विचारांचे दोन मुद्दे आहेत. एक शांतता हवी असणारा गट. त्यांना बुद्ध हवा आहे. ज्यांना युद्ध हवे आहे त्यांना बुद्ध नको आहे. पण मित्रांनो जीवनामध्ये शांततेने सहजीवन पेन, पुस्तक आणि बाबासाहेब.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ प्रेम जगात सर्वत्र प्रसिद्ध आहे. पुस्तकांसाठी घर बांधणारे कदाचित हे एकमेव व्यक्तिमत्व असावे. त्यांच्या ग्रंथालयाचे नाव राजगृह. याविषयीचा त्यांच्याविषयी लिहिलेला एक ग्रंथ वाचण्यात आला त्याचे नाव आहे आंबेडकर अनुयायांच्या नजरेतून…. या ग्रंथाचे संपादन सलीम युसुफजी यांनी केले आहे. आणि उर्मिला पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यातील पेन आणि पुस्तकाचा एक प्रसंग आपल्यासमोर ठेवू इच्छितो.
आपली मुले शाळेत जातात. आपणही शाळेत जात होतो, जात आहोत. आपल्याला पेन आणि पुस्तकांची आवड आणि आवश्यकता प्रत्येकालाच असते. आपण कशा प्रकारचे पेन वापरतो. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचे सर्वात महत्त्वाचे आयुध हत्यार चांगल्या अर्थाने म्हणजे पेन असतो. आता वापरा आणि फेकून द्या असेही पेन एक दोन रुपयात निघालेत. मी असे अनेक सुशिक्षित व्यक्ती पाहिले आहेत सकाळी सही करण्यासाठी दुसऱ्याचा पेन मागतात. बँकेमध्ये सार्वजनिक काउंटरवर एक पेन बांधलेला असतो. नजरचुकीने कोणी खिशाला पेन आणायचा विसरला तर त्याच्यासाठी ती सोय बँकेने केलेली असते. पण आम्ही असेही माणसे पाहिले आहेत की हा पेन वापरल्यानंतर दोरा तोडून स्वतःच्या घरी घेऊन जाणारी. हरकत नाही सॉरी आणि पेनची व पुस्तकांची चर्चा जरा बरे वाटले.
विद्वत्तेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना पेन आणि पुस्तक हे दोन फार महत्त्वाचे घटक आहेत. बाबासाहेब लिखाणाचे प्रचंड काम करत त्यांना पेनची आवड होती. पुस्तक विकत घेण्याबरोबरच त्यांना फाउंटन पेन म्हणजे शाईचे पेन निब आणि जीब असलेले. पेन आवडत असत. त्यांची निवड पेनच्या बाबतीत आणि पुस्तकांच्या बाबतीत फार चोखंदळ होती. ते ज्या शहरांमध्ये जात त्या ठिकाणच्या चांगल्या दुकानातून पुस्तके आणि पेन खरेदी करत. मुंबईतील एका स्टेशनरी दुकानात काम करणारा जॉन बाबासाहेबांसाठी चांगले पेन निवडून ठेवत असे. जॉन बाजारातले उत्तम पेन त्यांना दाखवायचा त्यांच्यासमोर उत्तम प्रकारचे पेन ठेवायचा. पण बाबासाहेब एक एक पेन हातात घ्यायचे आणि कच्च्या वहीत उमटवून बघायचे. त्या पानावर मग मोठी सही ते करायचे. मग जे पेन आवडतील ते बाजूला करायचे. असे किमान एका वेळी अर्धा डझन पेन तरी ते घेऊन जायचे आणि त्यांच्या कोटाच्या खिशात ते बसवायचे.
कदाचित पेनची किंमत जास्त असेल पण त्या पेनने जी साहित्य निर्मिती करणार आहात त्याचे मूल्य किती मोठे होते हे बाबासाहेबांना माहीत होते. त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी पुस्तके विकत घेण्याच्या क्षेत्रात कधी कंजूशी केली नाही. पैसे असूनही तसे करण्याचा अधिकार त्यांनी आपल्याला दिला आहे. हा लेख वाचताना जरा आपल्या खिशातील पेन तपासा किती मूल्यवान आणि किती किमतीचा आहे. आता किमतीवरून पेनची पारस करू नका. तो पेन चालतो कसा आणि हस्ताक्षर कसे येते यावर जरा नजर टाका. पुस्तके आणि पेन कशी निवडावीत याविषयी मी स्वतः बाबासाहेबांचा आदर्श घेतला आहे. माझ्या साहित्यात उत्तमातले उत्तम असे चांगले शाही पेन आहेत. आणि मी ते केवळ उगाच संग्रहात ठेवले नाहीत तर ते वापरतो.
बाबासाहेबांचे पुस्तकांवरील गाढे प्रेम त्यांची बुद्धिमत्ता त्यांनी पुस्तकांसाठी केलेला त्याग समर्पण भाव यावरून सर्व काही दिसून येते. त्याचबरोबर जगातील सर्वात सुंदर आणि समृद्ध असे वैयक्तिक ग्रंथालय उभारणारा हा थोर दृष्टापुरुष होय. ते ज्या प्रकाशाकाकडून आपली पुस्तके प्रकाशित करत त्यांच्याकडून पुस्तकाची रॉयल्टी आणि लेखनाचे मानधन या ऐवजी त्यापेक्षा जास्त किमतीची पुस्तके विकत घेत. त्यांच्या पुस्तकाच्या इतक्याप्रती निघाल्या खूप पुस्तके विकली गेली पण त्यांना जे काही मानधन मिळत असेल ते सर्व पुस्तके खरेदी करण्यात खर्च होत असे त्यांचे ग्रंथालय दुर्मिळ उत्तम संदर्भ असलेल्या पुस्तकांनी सुसज्ज असे. जो व्यक्ती त्यांचे अनुयायी म्हणून म्हणून घेतो त्या व्यक्तीने किमान बाबासाहेबांच्या या कृतीचे दहा टक्के तरी अनुकरण केले का याचा विचार अनुयायी म्हणून घेणाऱ्यांनी करावा.
कधी कधी तर ते इतकी पुस्तके खरेदी करत की त्यांना मिळालेल्या मानधनाहून अधिक पैसे त्यांना खर्च करावे लागत त्यामुळे प्रसंगी ते आर्थिक अडचणीत सुद्धा येत. ते जेव्हा एखाद्या शहरात आहेत अशी बातमी तेथील प्रकाशकांना मिळत असेल तेव्हा तेथील दुकानदार पुस्तकांची यादी त्यांच्यासाठी तयार ठेवत. त्यांना आवडणाऱ्या विषयांची अद्यावत पुस्तके त्यांची वाट बघत असत. ते पुस्तकाच्या दुकानात येत, खुर्चीवर बसून पुस्तके पहात आणि एक एक करून आवडलेली पुस्तके बाजूला ठेवत दुकानातील एक माणूस त्यांना पुस्तकाची शीर्षक आहे दाखवत. असे बाबासाहेब जर हो म्हणाले तर पुस्तक बाजूला काढले जाईल आणि नाही म्हणाले तर ते बाबासाहेब घेणार नाही हा निर्णय सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ होता. पुस्तक निवड आणि खरेदीच्या कामी कधी चार पाच तास खर्च होत हे त्यांनाही कळत नसे. निवडलेली पुस्तके दुकानाचा एक कर्मचारी त्यांच्या गाडीत ठेवत असे.
ठाकर नावाच्या एका प्रकाशकाकडे आणि दुकानदाराकडे ते बऱ्याचदा खरेदी करत. तेथील एका व्यक्तीने बाबासाहेबांना विचारले. आपण एवढे ग्रंथ खरेदी करता आपणास वाचण्यासाठी वेळ कधी मिळतो. मित्रहो आपल्यालाही असा प्रश्न कोणीतरी विचारला असेल किंवा भविष्यात विचारेल. त्याचे उत्तर काय असावे यासाठी बाबासाहेबांनी काय उत्तर दिले ते तपासून पहा.
पुस्तके वाचण्यासाठी वेळ काढावा लागतो, वेळ मिळत नाही. पुस्तके कशी वाचावीत याविषयी त्यांचे एक छोटेसे टिपण मुद्दाम येथे देत आहे. पुस्तक पहिला पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचण्यापूर्वी पुस्तकाचे शीर्षक म्हणजे नाव अगोदर पहावे. त्यानंतर मुखपृष्ठ अवलोकन करावे. निरीक्षण करावे आवर्जून पहावे. मग मलपृष्ठ आणि त्यावरील मजकूर शांतचित्ताने वाचावा. मग पुस्तकाची अनुक्रमणिका पहावी आणि संपूर्ण पुस्तक वाचून टाकावे. बाबासाहेबांनी किती छोट्या-मोठ्या गोष्टी वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आपल्यासमोर ठेवल्या होत्या.
आपला पेन कसा असावा ? आपल्या हाती ग्रंथ किती असावेत ? आपल्या उत्पन्नाच्या नुसार आपण ग्रंथ खरेदी करावीत ? ती आपल्या मुलांना द्यावी, तर मुलांना भविष्य उज्वल करण्यास संधी मिळेल. नाहीतर कितीही चांगला मोबाईल घेऊन दिला तर क्षणाचा आनंद मिळेल ज्ञानाचा आनंद नाही. मोबाईल उघडल्यावर नको ते रील पाहणाऱ्या व्यक्ती पुस्तक उघडून पुस्तकातील यशस्वी पात्राप्रमाणे जीवन घडविणारी ठरली तर.. म्हणून बाबासाहेब म्हणत हाती चांगला पेन हवा तर चांगले पुस्तक हवे आणि हे दोन्ही चांगले असतील तर शिक्षणाच्या ज्ञान प्रवाहामध्ये चांगल्या पद्धतीने पोहून आपल्याला ज्ञानवंत अशी पकड बनविता येईल.
त्यांनी आपणास संदेश दिला आता आपण काय संदेश घ्यायचा तो ज्याचा त्याने ठरवा.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
