बालवयातच तापलेल्या सळईने स्वतःच स्वतःचे गळू पोळवलेला हा वल्लभ असा धीट आणि धाडसी होता. अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे नेतृत्त्वगुण त्यांच्यात होते. ते सर्वधर्मसमभावाचा अंगीकार करणारे होते. शेतकऱ्यांचे वाली होते. तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्य सेनानी होते. स्वातंत्र्यानंतर उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि माहितीप्रसारणमंत्री या पदांवरून शेकडो संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताचे ऐक्य जपणारे द्रष्टे नेते होते. त्यांच्या समरणार्थ ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वोच्च पुतळा ही त्यांच्या उत्तुंग कार्याची साक्ष आपणा सर्वांना देत राहील. त्यांच्या संदर्भात जाणून घ्या डॉ. लता पाडेकर यांच्याकडून…
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
