April 14, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
GI tagged Ratnagiri Alphonso mango home delivery by India Post in Mumbai
Home » घरबसल्या मिळणार अस्सल रत्नागिरी हापूस! इंडिया पोस्टचा खास उपक्रम सुरू
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

घरबसल्या मिळणार अस्सल रत्नागिरी हापूस! इंडिया पोस्टचा खास उपक्रम सुरू

भारतीय टपाल खात्याच्या, मुंबई क्षेत्राकडून जी-आय टॅग असलेल्या रत्नागिरी हापूस आंब्यांची घरपोच डिलिव्हरी करण्यासाठी उपक्रम सुरू

मुंबई – सर्वसमावेशक विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यात हातभार लावण्याच्या आपल्या कटिबद्धतेला अनुसरून, इंडिया पोस्टच्या मुंबई क्षेत्र कार्यालयाने, जी आय- टॅग असलेल्या रत्नागिरी हापूस आंब्याच्या मुंबईभर घरपोच डिलिव्हरीसाठी, एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. जेणेकरुन, शेतकरी आणि नागरी ग्राहकांदरम्यान, थेट बाजारपेठ साखळी निर्माण होईल.

ह्या उपक्रमाचा उद्देश, केवळ ह्या हंगामापुरती सेवा देणे हा, नाही, तर आंबा उत्पादक बागायतदारांना आणि रत्नगिरीतील छोट्या व्यावसायिकांना एक कायमस्वरूपी पाठबळ देणारी व्यवस्था उभी करून देणे हा आहे. आपल्या व्यापक आणि विश्वासार्ह लॉजिस्टिक सेवा जाळ्याचा उपयोग करून, भारतीय टपाल खात्याने, मध्यस्थ लोकांचे उच्चाटन करून, शेतकऱ्यांनाच त्यांच्या उत्पादनांचा थेट लाभ मिळेल, हे सुनिश्चित केले आहे. तर, छोटे विक्रेते आणि कृषी उद्योजकांना, त्यांची उत्पादने महानगरांमधल्या बाजारपेठेत पोहोचवणे शक्य होईल, याचीही तजवीज केली आहे.

याची सहज उपलब्धता आणि सोय वाढवण्यासाठी, ह्या उपक्रमाअंतर्गत, QR कोड आणि व्हॉटसअप च्या मार्गे, ऑर्डर्स देण्याचे पर्यायही देण्यात आले आहेत. तसेच कॅश ऑन डिलिव्हरीची व्यवस्था आहे. यामुळे, अगदी छोट्या छोट्या उत्पादकांनाही, खूप मोठी गुंतवणूक किंवा पायाभूत सुविधा, मार्केटिंग न करता, आपल्या उत्पादकांची किरकोळ विक्री करता येणे शक्य होईल.

अगदी ताजी आणि काळजीपूर्वक डिलिव्हरी केलेल्या ह्या हापूस आंब्यामुळे, ग्राहकांना दर्जेदार फळे मिळतील, तर त्याचवेळी, ग्रामीण उपजीविका आणि स्थानिक उद्योजकतेला चालनाही मिळेल. यावेळी, मुंबईच्या टपाल खात्याच्या पोस्टमास्टर जनरल कैया अरोडा म्हणाल्या, ह्या उपक्रमाचा उद्देश, भारताच्या विस्तृत उपक्रमाचा लाभ घेऊन, रत्नागिरीचे स्थानिक आंबा उत्पादक आणि मुंबईतले लोक यांना परस्परांशी जोडणे हा आहे. जीआय टॅग असलेल्या आंब्यांची, घरोघरी डिलिव्हरी केल्यामुळे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची उत्तम किंमत मिळेल. तसेच कॅश ऑन डिलिव्हरीची ही सुविधा मिळेल.

आपल्या लॉजिस्टिक क्षमतांचा वित्तीय समवेशनासाठी उपयोग करत, इंडिया पोस्ट ने शेतकऱ्यांना पाठबळ देण्यातली आपली महत्वाची भूमिका, कायम ठेवली असून, छोट्या उद्योजकांना त्यातून चालना दिली जात आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

प्रेम चिरंतन…

प्रा. श्रीकृष्ण महाजन यांना डॉ. पी. सी. शेजवलकर पुरस्कार

…यासाठीच नको विदेशी वृक्षांची लागवड

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!