April 27, 2026
Cloudy sky with rainfall over a village landscape; forecast issued by Manikrao Khule, IMD Pune
Home » गुरुपौर्णिमे पर्यंतच्या पाच दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुरुपौर्णिमे पर्यंतच्या पाच दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

जोरदार पाऊस

आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. १० जुलै पर्यन्त नंदुरबार तसेच मुंबई सह संपूर्ण कोकण व विदर्भातील १९ जिल्ह्यांत आणि जळगांव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर अश्या ६ जिल्ह्यातील शिरपूर, सिंदखेडा, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, एदलाबाद, सुरगाणा, कळवण, दिंडोरी पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदगड व लगतच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

त्यामुळे घाटावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील गोदावरी, दारणा, गिरणा, वैतरणा, कश्यपी, कडवा, प्रवरा, भीमा, नीरा, इंद्रायणी, मुळा, मुठा, कुकडी, कृष्णा-कोयना, पंचगंगा, वारणा, दूधगंगा, भोगावती ह्या नद्या पूर-पाण्यासह दुथडी वाहु शकतात.

संपूर्ण मराठवाड्यातील ८ आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा तसेच जळगांव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर अश्या ६ जिल्ह्यातील  वर्षच्छायेच्या प्रदेशातील उर्वरित तालुक्यात रविवारपासुन पुढील तीन दिवस म्हणजे मंगळवार दि. ८ जुलै पर्यन्त  मध्यम पावसाची शक्यता जाणवते. तर त्यापुढील २ दिवस म्हणजे बुधवार व गुरुवारी ९ व १० जुलै ला ह्या भागात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

 शुक्रवार दि. ११ जुलै पासुन काहीशी उघडीप, काहीशी रिमझिम, तर मधूनच सूर्यदर्शन अश्या वातावरणाची शक्यता जाणवते.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

परतीच्या मार्गावरील मान्सून सप्ताहभर जाग्यावरच थबकणार

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची कृषी निर्यात 53.1 अब्ज डॉलर्स

शेती कोणी करायची ? यावर गांभिर्याने विचार करण्याची गरज

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!