आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश व नाशिक जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात बुधवार दि. ५ मार्च पासून पहाटे ५ च्या किमान तापमानात एकाकी घसरण झाली असुन महाराष्ट्रातील काही ठिकाणी म्हणजे नगर, जळगांव, नाशिक ह्या शहर व जिल्हा परिसरात थंडीची लाट व थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती जाणवू लागली आहे. ही परिस्थिती शनिवारी ८ मार्च पर्यंत राहण्याची शक्यता जाणवते.
कश्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली?
बुधवार दि.५ मार्चपासून उत्तर भारतातून उत्तर दिशेने महाराष्ट्राकडे थंडी घेऊन येणारे वारे महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश व नाशिक जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात धडकू लागल्यामुळे एकाकी ही थंडीत वाढ होतांना दिसत आहे.
गेल्या दिड महिन्यापासून म्हणजे २५ जानेवारीपासून ते काल बुधवार पर्यन्त बंगालच्या उपसागरातून पूर्वीय दिशेचे दमट व आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या एकसूरी वहनातून उत्तर दिशेने महाराष्ट्रात थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना अटकाव होत होता. तो अटकाव वारा वहन प्रणालीतून बदलातून जाणवत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.