fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 14, 2026
Home » Sachin Patil's 'Mayboli Rang Kathanche' Wins Raosaheb Patil Literary Award
काय चाललयं अवतीभवती

सचिन पाटील यांना रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार-२०२५ जाहीर

Cover of 'Mayboli Rang Kathanche edited by Sachin Patil, winner of the Raosaheb Patil Literary Award

सांगली – लेखक, चित्रकार सुरेन्द्र पाटील यांनी साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचन चळवळ – भाषा वृद्घीसाठी सातत्याने धडपडणाऱ्या लेखक, व्यक्ती यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांनी वडिलांच्या नावाने “रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार” देण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी कोणतीही प्रवेशिका नाही किंवा वितरणासाठी समारंभ ते घेणार नाहीत तर हा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीपर्यंत स्वतः जाऊन तो सन्मानाने त्यांना दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख ५००० रुपये, शाल, ग्रंथभेट, मानचिन्ह असे आहे. यंदा हा पुरस्कार सचिन वसंत पाटील यांना देण्यात येणार आहे.

सांगली जिल्ह्यातील कर्नाळ येथील सचिन वसंत पाटील यांनी संपादित केलेल्या ‘मायबोली रंग कथांचे’ या पुस्तकास रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. २२ बोली भाषेतील कथा या पुस्तकात त्यांनी संपादित केल्या आहेत. कथाकार पाटील यांनी एका अपघातात दोन्ही पायातील शक्ती गमावली. कमरेखालचा भाग कायमचा निर्जीव झाला; परंतु पुस्तक वाचनाने त्यांच्या जगण्याला बळ मिळाले. लेखनकार्यात त्यांनी स्वत:ला गुंतवून सांगावा, अवकाळी विळखा, पाय आणि वाटा अशा दखलपात्र पुस्तकांची निर्मिती केली आणि वॉकरवर जिद्दीने पुन्हा उभे राहिले… त्यांचे जीवन अनेकांना प्रेरक आहे, म्हणून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुरेन्द्र पाटील यांनी पुरस्काराची घोषणा केली आहे. लवकरच युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार देविदास सौदागर समवेत सचिन पाटलांच्या घरी जाऊन हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

Related posts

राष्ट्रसंत साहित्य विचारकृतीचा तेलंगानात डंका

गोव्यातील राजभाषा कायद्यात मराठीचे स्थान अबाधित – प्रमोद सावंत

विविध भाषातील २३ युवा लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!