May 3, 2026
Mumbai Marathi Literary Sangh invites submission of literary works for award
Home » मुंबई मराठी साहित्य संघातर्फे पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

मुंबई मराठी साहित्य संघातर्फे पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

मुंबई मराठी साहित्य संघातर्फे पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

मुंबई – येथील मराठी साहित्य संघातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी दिली आहे.

साहित्य संघातर्फे नीलिमा भावे पुरस्कृत ‘रा. भि. जोशी वैचारिक साहित्य पुरस्कार, कथाकाराच्या पहिल्या कथासंग्रहास कथाकार शांताराम पुरस्कार तर चंद्रगिरी पुरस्कार प्रवास वर्णनासाठी दिला जातो. या तीनही पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मान पत्र असे आहे. या व्यतिरिक्त साहित्य संघातर्फे मिलिंद गाडगीळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बालसाहित्य पुरस्कार’ देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख आणि सन्मान पत्र असे आहे. सर्व पुरस्कार साहित्य संघाच्या वर्धापनदिनी ऑक्टोबरमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

या चार पुरस्कारांच्या विचारार्थ १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवावयाच्या आहेत. अधिक माहितीसाठी दुपारी २ ते ८ या वेळेत ७३०४३ ६९३९६ या नंबरवर संपर्क साधावा.

पुस्तके पाठविण्याचा पत्ताः

अशोक बेंडखळे
कार्यवाह- साहित्य शाखा
मुंबई मराठी साहित्य संघ,
४था मजला, डॅा. भालेराव मार्ग,
गिरगांव, मुंबई ४००००४
भ्र. ७३०४३ ६९३९६ ( दु.२ ते ८)

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

‘ श्रीशब्द ‘ काव्यपुरस्कार जाहीर

छत्रपती संभाजीनगर येथील साक्षात कार्यक्रमात कवी अजय कांडर निमंत्रित

अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!