📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 1, 2026
काय चाललयं अवतीभवती

मुंबई मराठी साहित्य संघातर्फे पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

Mumbai Marathi Literary Sangh invites submission of literary works for award

मुंबई मराठी साहित्य संघातर्फे पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

मुंबई – येथील मराठी साहित्य संघातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी दिली आहे.

साहित्य संघातर्फे नीलिमा भावे पुरस्कृत ‘रा. भि. जोशी वैचारिक साहित्य पुरस्कार, कथाकाराच्या पहिल्या कथासंग्रहास कथाकार शांताराम पुरस्कार तर चंद्रगिरी पुरस्कार प्रवास वर्णनासाठी दिला जातो. या तीनही पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मान पत्र असे आहे. या व्यतिरिक्त साहित्य संघातर्फे मिलिंद गाडगीळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बालसाहित्य पुरस्कार’ देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख आणि सन्मान पत्र असे आहे. सर्व पुरस्कार साहित्य संघाच्या वर्धापनदिनी ऑक्टोबरमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

या चार पुरस्कारांच्या विचारार्थ १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवावयाच्या आहेत. अधिक माहितीसाठी दुपारी २ ते ८ या वेळेत ७३०४३ ६९३९६ या नंबरवर संपर्क साधावा.

पुस्तके पाठविण्याचा पत्ताः

अशोक बेंडखळे
कार्यवाह- साहित्य शाखा
मुंबई मराठी साहित्य संघ,
४था मजला, डॅा. भालेराव मार्ग,
गिरगांव, मुंबई ४००००४
भ्र. ७३०४३ ६९३९६ ( दु.२ ते ८)

Related posts

गार्गी आणि इतर एकांकिका पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य – कवी अजय कांडर

लोककलांचे विकृतीकरण थांबणे आवश्यक : डॉ. सदानंद मोरे

जी-20 आणि भारताचे अध्यक्षपद

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406