fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
July 8, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Weather Updates : पावसाचा जोर ओसरणार

१० जुलैपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता. पुढील दहा दिवस काहीशी उघडीप, पेरणीसाठी मार्गदर्शन, मान्सूनची स्थिती आणि धरणांतील पाणीसाठ्याबाबत माणिकराव खुळे यांचे विश्लेषण.
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

          १-  गुरुवार दि. २ जुलै पासुन जवळपास आठवडाभर मुंबईसह कोकण, घाटमाथा व नाशिक पुणे सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीलगतच्या पश्चिम भागात पावसाने दमदार तर उर्वरित महाराष्ट्राच्या भागात मध्यम तर काही ठिकाणी मुसळदार प्रमाणात हजेरी लावली. महाराष्ट्रात सुरु असलेल्या पावसाचा जोर, शुक्रवार दि. १० जुलै म्हणजे एकादशीपासून पासून मात्र ओसरण्याची शक्यता जाणवते.
              

        २-आता उघडीप कधी व किती दिवसाने मिळेल ?👇

            शुक्रवार दि. १० जुलै ते रविवार दि. १९ जुलैपर्यंतच्या संपूर्ण दहा दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात सुद्धा सध्याच्या पावसाची तीव्रता कमी होवून केवळ हलक्याच पावसाची शक्यता असु शकते.

          ३-उघडीप कश्यामुळे?

              i) पावसाळी हंगामातील महाराष्ट्रातील पावसाला पूरक ठरणारा देशाच्या मध्यावरील दिड किमी. उंचीपर्यंतचा पुर्वो-पश्चिम हवेच्या कमी दाबाचा आस त्याच्या सरासरी जागेपासून अधिक उत्तरेकडे म्हणजे पंजाब हरियाणा यू पी राज्याकडे कडे सरकण्याची शक्यता आहे.

ii)अरबी समुद्र पश्चिम किनारपट्टी समांतर हवेच्या कमी दाबाची दक्षिणोत्तर तटीय द्रोणीय आस (घळ) ही विरळतेतुन उथळ होण्याची शक्यता आहे.

             iii)बंगालच्या उपसागरातील उंचीवरील हवेचे तीव्र कमी दाब क्षेत्र हे पूर्व भारतात जोरदार पाऊस देत पश्चिम बंगाल व ओरिसातून उत्तर व उत्तर -वायव्येकडे मार्गक्रमण करत येत्या दोन दिवसात दक्षिण राजस्थान मध्ये विरळ होण्याची आहे. त्यामुळे 👇

            अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे सध्याचे बळकट मान्सून वारे कमकुवत होण्याची शक्यता आहे. 👇 त्यामुळे पुढील १० दिवस पावसाचा जोर कमी होवून महाराष्ट्रात काहीशी उघडीप जाणवणार आहे.

         ४- स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल इतकी उघडीपी असेल काय?

         नाही. 👇 महाराष्ट्राच्या सर्व भागात नाही. परंतु भाग बदलत काही ठिकाणी उघडझाप व ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तर काही ठिकाणी भौ. रचनेनुसार स्वच्छ सूर्यप्रकाशही मिळू शकतो.
       उघडीपी दरम्यान दुपार ३ चे दिवसाचे कमाल तापमान त्या आठवड्यात असणाऱ्या सरासरी तापमानापेक्षा १-२ डिग्रीने खालवलेले असेल. म्हणजे ते २८ ते ३० डिग्री अंश से. दरम्यानचे असु शकते.

       ५- महाराष्ट्रातील पाऊस, पेर-ओल व पेरणी-

            शुक्रवार दि. १० जुलै नंतर जसजशी जमीन पोतानुसार म्हणजे काळ्या कसदार जमिनीत जेथे १०  ते १२ सेमी. किंवा अधिक आणि हलक्या जमिनीत १५ ते २० सेमी. ओल प्राप्त झाली असेल तर शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतःच्या विवेकावर घ्यावा, असे वाटते.

       ६-आता उर्वरित जुलै महिन्यात पुन्हा पावसाला सुरवात कधी होवू शकते ?
        
             त्यापुढील म्हणजे २० ते २४ जुलै दरम्यानच्या जुलै च्या तिसऱ्या आठवड्यातील महाराष्ट्रातील पाऊस वा उघडीपी संबंधीचा खुलासा शुक्रवार दि. १७ जुलै दरम्यान  तयार होण्याऱ्या वातावरणीय प्रणाल्यांच्या निर्मिती शक्यतेच्या आधारावरच अवलंबुन आहे. अर्थात त्यावेळीच त्या संबंधी खुलासा होवू शकेल.       
       
         ७- मान्सून कधी संपूर्ण देश काबीज करणार?

          मान्सून सहसा ८ जुलै ह्या त्याच्या सरासरी तारखेला संपूर्ण देश काबीज करत असतो.  परंतु ह्यावर्षी अजुनही राजस्थानच्या वायव्य भागात मान्सून पोहोचवयाचा आहे. तो सुद्धा येत्या ३ दिवसात म्हणजे १० जुलै दरम्यान संपूर्ण देश काबीज करेल असे वाटते.
         मान्सून ने वेळेत देश काबीज करणे, हे मान्सूनच्या उर्वरित काळातील गतिविधीस पूरक ठरतो.

        ८- भू -जल, धरणे व इतर जलाशये यांच्या पाणी पातळीतील वाढीसंबंधी काय भाष्य करता येईल?

         खरं तर, हीच वेळ पाणी पातळीत वाढ होण्याची असते. महाराष्ट्रात जुलै व ऑगस्ट महिन्यात घाट माथ्यावर कोसळणारा झडीचा मोसमी भीज पाऊसच जमीन भू- जलपातळीत, मोठी व लघु धरणे, साठवण जलाशये व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ करत असतात. अजुन जुलै ऑगस्ट महिने पूर्णपणे जावयाचे आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाने धरणे व इतर जलाशयात साठवणीचा श्रीगणेशा केला आहे. ऑक्टोबर अखेर नक्कीच पाणी पातळीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

         ९-पंढरीची वारी व पाऊस

           पुणे परिसरातील नद्यांच्या महापुरामुळे दोन्हीही पालख्यांच्या प्रस्थानादरम्यान व पुण्यात मुक्कामाला येईपर्यंतच्या प्रवासात वारकऱ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागेल. पुण्यातील मुक्कामानंतरचा प्रवासात वारकऱ्यांना पावसाचा विशेष त्रास जाणवणार नाही. त्यापुढील आठवड्याभराचा सुरळीत होवू शकतो, असे वाटते.

Related posts

हिमनग – अदृश्य भीषण वास्तव

बळीराजाचं ‘बाटुक’ आयुष्य — कवितेतून उमटलेली जिव्हारी लागणारी वेदना

अक्षरदानमध्ये जगण्याच्याही बाजाराचे चित्र !

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!