पुणे :- राजगुरुनगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदच्या शाखेतर्फे विविध साहित्य प्रकारातील पुरस्कांची घोषणा करण्यात आले असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे यांनी दिली. या पुरस्कारांचे वितरण ११ फेब्रुवारी २०२४ (रविवारी) रोजी येथील पंचायत समिती सभागृहात सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
जाहीर करण्यात आलेले साहित्य पुरस्कार असे –
पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार –
इष्टक – अनिल धाकू कांबळी (कणकवली),
कासरा – ऐश्वर्य पाटेकर (नाशिक),
ब्लाटेन्टीया – बाळासाहेब लबडे (गुहागर),
काळजाचा नितळ तळ – भीमराव धुळूबळू – सांगली,
शिल्लक भीतीच्या गर्भ कोशातून – स्नेहा कदम (मुंबई)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कादंबरी पुरस्कार –
दयन – प्रा.युवराज पवार (धुळे),
नैमिषारण्यात अर्ध्या रात्री – मुरलीधर सुतार (तळेगाव दाभाडे) .
कै. शंकर पाटील कथासंग्रह पुरस्कार
उसवण – लक्ष्मण दिवटे – बीड
झालं गेले – साहेबराव पवळे – पुणे
चंद्रकुमार नलगे ललित लेखन पुरस्कार
ललितरंग – विद्या पेठे ( पुणे)
