fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
July 8, 2026
काय चाललयं अवतीभवती

पावसाची शक्यता महाराष्ट्रात कश्यामुळे वाढली ?

How did the chances of rain increase in Maharashtra

मतदानाच्या दिवशीही पावसाची शक्यता ‘

अजुन किती दिवस आहे हा अवकाळी?

महाराष्ट्रातील  (संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ) अश्या २९ जिल्ह्यात आजपासुन पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार (दि.१८) मे पर्यन्त ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी भाग बदलत किरकोळ अवकाळी (गडगडाटीसह विजा, वारा, गारा व धारा सह ) पावसाची शक्यता जाणवते.

कोणत्या भागात व कोणत्या दिवशी गारपीटीच्या  शक्यता अधिक आहे ?

विशेषतः शनिवार ( दि.११ ) ते मंगळवार ( दि.१४ मे ) असे चार दिवस संपूर्ण  विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ) अश्या २९ जिल्ह्यात मध्यम अवकाळी ( गडगडाटीसह वीजा, वारा व गारा) पावसाची शक्यता अधिक जाणवते.

कोणत्या जिल्ह्यात विशेषतः अवकाळीचा जोर अधिक जाणवेल?

रविवार ( दि.१२ ) ते मंगळवार ( दि.१४ मे ) पर्यंतच्या ३ दिवसात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली ह्या आठ जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीच्या शक्यतेची तीव्रता अधिकच जाणवू शकते.

मुंबईसह कोकणातही अवकाळीची शक्यता वाढली आहे काय?

महाराष्ट्रावरील ‘वारा खंडितता’ प्रणालीतून, समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत, तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा दक्षिणोत्तर द्रोणीय आसाचा झोका, सध्या अधिक पश्चिमेकडे म्हणजे पार सह्याद्री पायथ्यापर्यंत कधी कधी पोहोचत असल्यामुळे, आजपासुन म्हणजे शनिवार दि.११ ते गुरुवार दि.१६ मे पर्यंतच्या सहा दिवसात मुंबई, उपनगरसह संपूर्ण कोकणातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग  अश्या ७ जिल्ह्यातही आता मात्र ढगाळ वातावरण राहून अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे.

अवकाळी आहे मग महाराष्ट्रात उष्णतेची स्थिती काय असेल?

आजपासुन शनिवार ( दि.११ ) ते शनिवार ( दि.१८ मे ) पर्यंतच्या आठवड्यात  मुंबईसह कोकणातील कमाल व किमान तापमानेही सरासरी इतके म्हणजे ३३ व २५ डिग्री से. ग्रेड  तर उर्वरित महाराष्ट्रात ते ४० व २६ डिग्री से. ग्रेड दरम्यानचे असतील.
                 उष्णतेची लाट, दमटयुक्त उष्णता, किंवा रात्रीच्या उकाड्याची शक्यता सध्या महाराष्ट्रात जाणवणार नाही,असे वाटते.

ह्या अवकाळी पावसाची शक्यता महाराष्ट्रात कश्यामुळे वाढली आहे ?

(i)पश्चिम उत्तर प्रदेशातील मध्यभागातील क्षेत्रात  समुद्रसपाटीपासून दिड किमी.वर उंचीपर्यंत तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याची स्थिती व तसेच  
(ii) ह्या चक्रीय वारा क्षेत्रापासून दक्षिण आसाममधील हाफलॉंग व सिल्चर पर्यन्त,  समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यन्तच्या पातळीत पूर्व-पश्चिम पसरलेल्या हवेच्या कमी दाबाच्या आस व त्यामुळे दोन्हीही समुद्रातून होणाऱ्या बाष्प पुरवठ्यामुळे                           
(iii )मराठवाडा ते कन्याकुमारी पर्यंतच्या वारा खंडितता प्रणाली व त्यातून तयार झालेला ९०० मीटर उंचीपर्यंतचा हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे महाराष्ट्रात अवकाळी व गारपीटीचे वातावरण तयार झाले आहे.

मतदानासाठी वातावरणीय दक्षता घेण्याची गरज आहे काय ?

                  महाराष्ट्रातील लोकसभा चौथ्या टप्प्यातील मतदान सध्या सोमवार, दि.१३ मे रोजी असुन त्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता अधिक असल्यामुळे, मतदारांनी विशेषतः सकाळ व दुपारच्या प्रहरात म्हणजे दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान उरकल्यास,  त्यांना अवकाळी वातावरणाचा  कोणताही विशेष अडथळाही जाणवणार नसुन मतदान सुखकर व सोयीने होवु शकते, असे वाटते.

माणिकराव खुळे,
हवामान तज्ज्ञ

Related posts

नवदुर्गाः आधुनिक बहिणाबाई विमल माळी

कोल्हापूरमध्ये मोडी लिपीचे एक महिन्याचे प्रमाणपत्र प्रशिक्षण

धनेश मित्र !

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!