fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
July 4, 2026
काय चाललयं अवतीभवती

भुलाईमुळे लोकभाषेला संरक्षण…

Comments on Bhulai Prof Pratima Ingole Poem Book

कवितेतील वऱ्हाडीचे बोल वाचताना चाकोलीवानी उमटली त्यात अंतरीची ओल ! हा अनुभव रसिकांना येईल ! म्हणूनच प्रा. इंगोले यांनी आपल्या कविता लोकभाषेत लिहिल्यामुळे त्यांच्या संरक्षणाचा पाया त्यांनी घालून दिला.

-पद्मश्री डाॅ. वि. भि. कोलते.

माजी कुलगुरू, नागपूर विद्यापीठ, नागपूर.

भुलाई या काव्यसंग्रहातील केवळ भाषेचे स्वरूप महत्त्वाचे नाही ते तर महत्त्वाचे आहेच, पण त्याचबरोबर त्यातील काव्यामधली काव्यगुण अधिक महत्त्वाचे आहेत. काव्यात कवीच्या अंतःकरणातील हळुवार भावभावना व्यक्त झाल्या पाहिजेत. खेड्यात जीवन कंठलेल्या प्रा. प्रतिमा इंगोले यांच्या भुलाईतील प्रत्येक कविता हा त्यांच्या अंतःकरणाचा आविष्कार आहे, आणि तो काव्यात्मक आणि कल्पना आविष्कारने नटलेला आहे. भाषेच्यादृष्टिने त्यात जशी त्यांची प्रतिमा उमटलेली आहे, तसेच त्यांच्या सर्वच कवितांत त्यांच्या प्रतिमेचे सौंदर्य व्यक्त झालेले आहे. या भुलाईतील कोणतीही कविता याची साक्ष देईल. कल्पना सौंदर्य व प्रतिभेचा आविष्कार ही त्या कवितांची प्रमुख वैशिष्ठ्ये होत, असे मला वाटते. त्यांच्या मनोगतात देखील हे गुण दिसून येतात.

झोक्यावर झोका
हालल्या भावना
धावल्या झोंबल्या
बिलगल्या मना !
या यातील काही ओळीच पहा ना ! त्यांच्या कवितेतील वऱ्हाडीचे बोल वाचताना चाकोलीवानी उमटली त्यात अंतरीची ओल !हा अनुभव रसिकांना येईल ! म्हणूनच प्रा. इंगोले यांनी आपल्या कविता लोकभाषेत लिहिल्यामुळे त्यांच्या संरक्षणाचा पाया त्यांनी घालून दिला.


कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा उत्स्फूर्त अभिप्राय

भुलाई या काव्यसंग्रहातील कविता अव्वल दर्जाच्या आहेतच पण वऱ्हाडी बोलीमुळे त्यांचे माधुर्य वाढलेले आहे. या कवितेने आणि इतरही साहित्याने प्रा. प्रतिमा इंगोले यांनी वऱ्हाडी बोलीला आणि पर्यायाने मराठी साहित्याला आणखी वेगळी श्रीमंती दिली आहे.

वि. वा. शिरवाडकर

Related posts

बलवडी येथे रविवारी ३० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

विदर्भ-मराठवाड्यात गुढीपाडव्याला गारपीटीची शक्यता

कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच ‘ नाटकाचा 13 रोजी मुंबई येथे विशेष प्रयोग

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!