May 20, 2026
Home » अग्रणी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

अग्रणी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Agrani Sahitya Pratishthan, Deshing-Haroli, has invited books published in 2025 for state-level literary awards in poetry, fiction, novels and overall literature.

सांगली : अग्रणी साहित्य प्रतिष्ठान, देशिंग-हरोली यांच्या वतीने विविध साहित्य पुरस्कारांसाठी साहित्यकृती मागविण्यात येत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कवी दयासागर बन्ने आणि विद्यमान अध्यक्ष भरत खराडे यांनी दिली आहे. जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार आहे.

या पुरस्कारांमध्ये कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी तसेच समग्र साहित्य या विभागांचा समावेश असून पुरस्कार वितरण नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अग्रणी साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. लेखकांनी प्रकाशित पुस्तकाच्या दोन प्रती व अल्प परिचय पाठवावा. पुस्तके पाठविण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२६ अशी आहे. पुरस्कारासाठी फक्त प्रथम आवृत्तीची पुस्तके ग्राह्य धरली जाणार असून द्वितीय आवृत्ती स्वीकारली जाणार नाही. समग्र पुरस्कारासाठी सर्व साहित्य प्रकारांतील कलाकृती स्वीकारल्या जाणार असून त्यातून उत्कृष्ट कलाकृतीची निवड केली जाईल. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच शाल-श्रीफळ असे राहणार आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता :

मनीषा पाटील-हरोलीकर,
कार्यवाह, अग्रणी साहित्य प्रतिष्ठान
मु.पो. देशिंग-हरोली
ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली
पिन कोड – ४१६४१०

संपर्क : दयासागर बन्ने – ९९६०७२४२७७
संस्थापक अध्यक्ष, अग्रणी साहित्य प्रतिष्ठान, देशिंग-हरोली.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच ‘ नाटकाचा 13 रोजी मुंबई येथे विशेष प्रयोग

दमसाचे ३६ वे साहित्य संमेलन शुक्रवारपासून गडहिंग्लजला

महाराष्ट्र व गुजरात राज्ये भिन्न परंतु आत्मा एक : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406