fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
July 5, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘ मोंथा ‘ हिमालयात विरळले तर डिप्रेशन कच्छच्या आखातात विरळणार !

‘मोंथा’ चक्रीवादळ हिमालयात विरळले, तर डिप्रेशन कच्छच्या आखातात विरळणार, महाराष्ट्रात वातावरण निवळण्यास सुरुवात व आठ नोव्हेंबरपासून थंडीची चाहूल लागणार, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

मान्सून पूर्णपणे परतल्यावरही, दोन्हीही समुद्रातील प्रणाल्याच्या परिणामातून गेल्या १० ते १२ दिवसात पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांची दमछाक केली. बंगालच्या उपसागरातील ‘ मोंथा ‘ चक्रीवादळाचे अवशेष १ नोव्हेंबरला हिमालयीन पश्चिम बंगाल मध्ये विरळले. तर अरबी समुद्रातील डिप्रेशन आज तीन नोव्हेंबरला गुजरातमधील कच्छच्या आखातात विरळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात वातावरण निवळण्याची प्रक्रिया सुरु असली तरी,  मुंबईसह संपूर्ण कोकण व मध्य महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात मात्र अजूनही तीन नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता ही जाणवतेच. विशेषतः  मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगांव, छत्रपती संभाजी नगर, उत्तर अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर ह्या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल. त्यापुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार दि. ६ नोव्हेंबर पर्यन्त केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता असुन शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर पासुन काही दिवसाकरता पावसाळी वातावरण निवळण्याची शक्यता जाणवते.

शनिवारपासून थंडीची चाहूल

शनिवार दि. ८ नोव्हेंबर पासुन हळूहळू थंडीची चाहूल लागण्याची शक्यता जाणवते. असे असले तरी, लगेचच नाही परंतु नोव्हेंबर महिन्यात, महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता अजूनही पुढे नाकारता येत नाही. तसेच नोव्हेंबर महिन्यात अतिजोरदार थंडीची शक्यताही सध्या जाणवणार नाही, असे वाटते. वातावरणातील बदलानुसार नोव्हेंबर मधील थंडी व पावसाबद्दल तसे आगाऊ अवगत केले जाईल.

आज बंगालच्या उपसागरात ब्रम्हदेश व बांगलादेश किनारपट्टीदरम्यान पुन्हा एक नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असुन पुढील २ दिवसात त्या किनारपट्टीनेच ते वायव्ये दिशेकडे सरकण्याची शक्यता जाणवते.

Related posts

भारत काकडीचा सर्वात मोठा निर्यातदार

रिठा (ओळख औषधी वनस्पतीची)

फणसाच्या बिया..निसर्गाची किमया

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!