May 16, 2026
The minimum temperature is dropping the cold is increasing
Home » किमान तापमान घसरतेयं, थंडी वाढतेयं !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

किमान तापमान घसरतेयं, थंडी वाढतेयं !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

‘ किमान तापमान घसरतेयं, थंडी वाढतेयं!’

किमान तापमान –
शुक्रवार दि. ३ जानेवारीपासुन पहाटेचे किमान तापमानात घसरण होत असुन, आज संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरी इतके तर भाग परत्वे बऱ्याच ठिकाणी अर्ध्या डिग्रीपासून ते साडे तीन डिग्रीपर्यंत खालावले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रातही ह्या आठवड्यात हळूहळू थंडीत वाढ होण्यास सुरवात झाली आहे.

आज तर जळगांव, नगर, पुणे, नागपूर शहरातील पहाटेचे किमान तापमान तर एकांकी संख्येवर पोहोचले आहे. कोकणात सुद्धा डहाणू, हर्णाई, मुंबई, सांताक्रूझ येथेही सरासरीपेक्षा अर्ध्या डिग्रीने किमान तापमान खालावले आहे.

कमाल तापमान –

ह्या उलट दुपारी ३ चे कमाल तापमान मात्र संपूर्ण महाराष्ट्रात भाग परत्वे सरासरीपेक्षा एक  डिग्रीपासून ७ डिग्रीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे दिवसा ऊबदार पणा तर रात्री थंडी जाणवत आहे.

आर्द्रता –
आज सकाळची सापेक्ष आर्द्रता ही सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात डहाणू ,सांताक्रूझ, नगर, सोलापूर वगळता भाग परत्वे सरासरीपेक्षा एक पासून २९ % पर्यन्त खालावली असल्यामुळे, हवेतही त्यामानाने कोरडेपणा असुन पहाटे पडणारे दव, धुके ही विशेषकरून जाणवणार नाही, असे वाटते. त्यामुळे एकूणच हे वातावरण रब्बी पिकास अत्यंत लाभदायक ठरु पाहत आहे.

सध्या पुढील १५ दिवस तरी म्हणजे गुरुवार दि. १६ जानेवारीपर्यन्त महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. तोपर्यंत चांगल्या लाभदायक थंडीची अपेक्षा करू या !

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

स्वनिर्मित सौर विजेवर कर : हरित ऊर्जा धोरणातील विरोधाभास !

सुवर्ण प्राशन म्हणजे काय? जाणून घ्या सर्व माहिती

गूढ आणि वलयकारी ब्लॅक पँथर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406