April 17, 2026
Maharashtra Sahitya Parishad announces Shirur Rural literary award
Home » महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणचे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणचे साहित्य पुरस्कार जाहीर

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण यांनी आयोजित केलेले उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार जाहीर झाले असून येत्या मार्च महिन्यात पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येणार आहे, अशी माहिती मनोहर परदेशी यांनी दिली आहे.

पुरस्कारासाठी एक जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रसिद्ध झालेली साहित्य कृती मागवण्यात आली होती. राज्यभरातुन जवळपास दीडशे पुस्तक प्राप्त झाले होते यामध्ये ललित, बालसाहित्य, कथासंग्रह, कादंबरी आणि कविता यांचा समावेश होता. अनुभवी परीक्षकांकडुन उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करण्यात आली आहे. या विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार सन २०२४ चे विजेते असे –

कथासंग्रह
प्रथम क्रमांक: वाटणी लेखक दीपक तांबोळी
द्वितीय क्रमांक- उसवण- लेखक लक्ष्मण दिवटे

विभाग कवितासंग्रह
प्रथम क्रमांक- मन फुलपाखरू -कवी दत्ता पाटील
द्वितीय क्रमांक – संगीत श्रावणाचे कवी कमलाकर राऊत

विभाग बाल साहित्य :
प्रथम क्र. – फुलांचे संमेलन – लेखक बाळकृष्ण बाचल
द्वितीय क्र. – ताई माझी आई लेखक गणेश भाकरे

विभाग ललित साहित्य
प्रथम क्रमांक – मनातले गाव – लेखक उत्तम सदाकाळ
द्वितीय क्रमांक – शब्दसोहळा – लेखक प्रकाश बोधे

विभाग कादंबरी
प्रथम क्रमांक – तुटलेला धागा – लेखिका सुभा लोंढे
द्वितीय क्रमांक – अर्धा कोयता – लेखिका अलकनंदा घुगे

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

जनसंपर्काच्या अंतरंगा’चा सर्वंकष वेध घेणारे पुस्तक

पेजरचे स्फोट !

काळानुसार बदलती आव्हाने पेलण्यास आजची स्त्री सक्षम – वृषाली पाटील

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!