📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 19, 2026
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणचे साहित्य पुरस्कार जाहीर

Maharashtra Sahitya Parishad announces Shirur Rural literary award

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण यांनी आयोजित केलेले उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार जाहीर झाले असून येत्या मार्च महिन्यात पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येणार आहे, अशी माहिती मनोहर परदेशी यांनी दिली आहे.

पुरस्कारासाठी एक जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रसिद्ध झालेली साहित्य कृती मागवण्यात आली होती. राज्यभरातुन जवळपास दीडशे पुस्तक प्राप्त झाले होते यामध्ये ललित, बालसाहित्य, कथासंग्रह, कादंबरी आणि कविता यांचा समावेश होता. अनुभवी परीक्षकांकडुन उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करण्यात आली आहे. या विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार सन २०२४ चे विजेते असे –

कथासंग्रह
प्रथम क्रमांक: वाटणी लेखक दीपक तांबोळी
द्वितीय क्रमांक- उसवण- लेखक लक्ष्मण दिवटे

विभाग कवितासंग्रह
प्रथम क्रमांक- मन फुलपाखरू -कवी दत्ता पाटील
द्वितीय क्रमांक – संगीत श्रावणाचे कवी कमलाकर राऊत

विभाग बाल साहित्य :
प्रथम क्र. – फुलांचे संमेलन – लेखक बाळकृष्ण बाचल
द्वितीय क्र. – ताई माझी आई लेखक गणेश भाकरे

विभाग ललित साहित्य
प्रथम क्रमांक – मनातले गाव – लेखक उत्तम सदाकाळ
द्वितीय क्रमांक – शब्दसोहळा – लेखक प्रकाश बोधे

विभाग कादंबरी
प्रथम क्रमांक – तुटलेला धागा – लेखिका सुभा लोंढे
द्वितीय क्रमांक – अर्धा कोयता – लेखिका अलकनंदा घुगे

Related posts

सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन अध्यक्षपदी नीरजा यांची निवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

मसापच्या दामाजीनगर शाखेच्यावतीने साहित्य पुरस्कारांची घोषणा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406