कोल्हापूर – जीवनाची सकारात्मकता साहित्यातून यावी. लेखकाचा लेखन धर्म आणि वाचकाचा वाचन धर्म कायम असला पाहिजे. लेखक लिहितो म्हणजे तो आतून व्यक्त होतो, काळजातली घुसमट मांडतो. भवताल मांडतो. विज्ञान युगात मनाची संवेदनशीलता लेखकाने हरवू देऊ नये. उद्याचा आशावादी लेखक याच मातीतून जन्माला येणारा असेल” असा आशावाद शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव, डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी व्यक्त केले.
राऊत परिवार पुरस्कृत शब्दांगण साहित्य पुरस्कार कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवयित्री नीलांबरी कुलकर्णी होत्या. प्रारंभी दीपप्रज्वलन आणि गजानन महाराजांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.
कवी अशोक भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कवी संमेलनात सुमारे 22 कवींनी सहभाग नोंदवला. कविसंमेलनाची सूत्रे सौ. वनिता पाटील यांनी सांभाळली.
प्रास्ताविक अध्यक्षा सौ. शोभा राऊत यांनी केले. मान्यवर पाहुण्यांचा परिचय डॉ .चंद्रकांत पोतदार यांनी करून दिला. मान्यवरांच्या स्वागतानंतर कादंबरी आणि कवितासंग्रह पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सौ .समृद्धी राऊत, धनश्री खाडे, धर्मवीर पाटील, धनाजी घोरपडे आदींनी मनोगत व्यक्त केले .
अध्यक्षा निलंबरी कुलकर्णी यांनी ” साहित्याच्या समृद्ध वाटा करताना वाचनाच्या मुळाशी आपण गंभीरपणे असले पाहिजे. कथा, कविता, कादंबरी ,नाटक अशा सर्वांगीण विचार साहित्यातून व्यक्त केला पाहिजे.” असे मत व्यक्त केले .
यावेळी परीक्षक म्हणून काम केलेल्या सौ.वनिता पाटील, सौ.शोभा राऊत, डॉ चंद्रकांत पोतदार, सौ.पल्लवी भागवत, यांचा सत्कार सतीश राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन व आभार डॉ.चंद्रकांत पोतदार यांनी मानले. यावेळी प्रकाश पोतदार, बाळकृष्ण पाटील, मीनल कुलकर्णी, वनिता पाटील, अपूर्वा पाटील, अर्पणा पाटील, पल्लवी भागवत, नरेंद्र कुलकर्णी, शितल शेटे अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समृद्धी राऊत, सुमित राऊत ,शौर्य राऊत, धैर्य राऊत, सुप्रिया मायनेकर आदींनी परिश्रम घेतले.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
