कोल्हापूर – न्या. एच. आर. खन्ना यांचे जीवन म्हणजे एक तेजस्वी दीपस्तंभ, जो अंधारातही न्यायाचा मार्ग उजळवतो. त्यांच्या विचारांची तार्किकता, स्पष्टता आणि तत्वनिष्ठ निर्णय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील अमिट ठसे आहेत. त्यांचे न्यायालयीन निर्णय न्यायिक विवेकबुद्धीने केलेले नैतिक व ऐतिहासिक विधान होते. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी ॲड विलास पाटणे लिखीत न्या एच आर खन्ना यांचेवरील पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहातील प्रकाशन प्रसंगी बोलत होते.
ॲड विलास पाटणे यांचे व्यक्तिमत्व कायद्याच्या गाभ्याशी जोडलेले आहे, जे न्यायाच्या संवेदनशील व मानवी धाग्यांना समजून घेते. या ग्रंथात न्या खन्ना यांच्या केवळ चरित्राचाच नव्हे तर त्याकाळातील न्यायिक घडामोडींचा धांडोळा ओघवत्या शैलीत घेतात. ते वाचणे उद्बोधक आणि प्रेरक आहे.
भूषण गवई, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
” एडीएम जबलपूर खटल्यातून त्यांनी राज्यघटनेच्या पावित्र्याकरिता धैर्य, सामर्थ्य आणि दृढता अधोरेखित केली. न्या खन्ना यांनी बाणेदारपणे सर्वोच्च न्यायाधीशपदाचा बाणेदारपणे त्याग केला . आपल्या न्यायालयीन निर्णयाने त्यांनी संविधानाचे जतन केले असे वक्तव्य याप्रसंगी लेखक रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड विलास पाटणे यांनी केले
याप्रसंगीय कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील, ॲड राजशेखर मलूस्टे, ॲड अमोल सामंत , ॲड शाल्मली अंबुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
