कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात आली आहेत. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेली पुस्तके येत्या ३१ जानेवारी २०२६पर्यत पाठवावीत असे आवाहन साहित्य सभेच्यावतीने करण्यात आले आहे.
दमसाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यासह बेळगाव परिसरातील लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. देवदत्त पाटील पुरस्कार (कादंबरी), अण्णा भाऊ साठे पुरस्कार (कथा, ललित), शंकर खंडू पाटील पुरस्कार (कथासंग्रह), कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार ( वैचारिक, संशोधन ), शैला सायनाकर पुरस्कार ( कवितासंग्रह), चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) याबरोबरच बालवाड्मय पुरस्कारही देण्यात येतो.
इच्छुक लेखक, प्रकाशक यांनी पुस्तकाच्या दोन प्रती ,फोटो आणि परिचय अर्जासोबत ३१ जानेवारी २०२६ पर्यंत कार्यवाह, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, जी – ६, स्मृती आपर्टंमेंट, बाबूजमाल रोड, सरस्वती टाँकीजवळ, कोल्हापूर ४१६००२ या पत्यावर पाठवावे.
अधिक माहितीसाठी कार्यवाह डॉ. विनोद कांबळे (९८५०४३३८०७) यांच्याशी संपर्क साधावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
