September 13, 2025
१४ व १५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात अतिजोरदार पावसाचा इशारा. पुणे, सातारा घाटमाथा, कोकण व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Home » महाराष्ट्रात रविवारी, सोमवारी अति जोरदार पाऊस
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात रविवारी, सोमवारी अति जोरदार पाऊस

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

            १- अतिजोरदार पाऊस –

                मान्सूनच्या सक्रियते नंतर आजपासुन सुरु होणाऱ्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे गुरुवार १८ सप्टेंबर पर्यन्त महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अश्या पावसाची शक्यता निर्माण झाली असुन त्यातही उद्या व परवा, म्हणजे रविवार व सोमवार १४ व १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.

   अत्याधिक पाऊस-

  त्यातही विशेषतः पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर म्हणजे मावळ, मुळशी, ताम्हिणी, लोणावळा, खंडाळा, वेल्हे तसेच पोलादपूर, महाबळेश्वर, जावळी, पाटण व लागतच्या परिसरात ह्या दोन दिवसात अत्याधिक पावसाची शक्यता जाणवते.

            ३-पाऊस तीव्रतेतील कमी अधिक फरक –

                मंगळवार १६ सप्टेंबर पासुन संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या १८  जिल्ह्यात पावसाचा जोर (तीव्रता)  पूर्णपणे नव्हे परंतु काहीसा कमी जाणवेल.
      
कोकण, विदर्भातील पावसाचे सातत्य-

            मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ अश्या १८ जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाचे सातत्य सध्या तरी आजपासुन पुढील १० दिवस म्हणजे २२ सप्टेंबर पर्यन्त टिकून राहण्याची शक्यता जाणवते.

           ३-वेध परतीच्या पावसाचे –

            परतीच्या पावसाचे वेध जरी लागले असले तरी पावसाच्या इतर प्रणाल्यांचे अस्तित्व पाहता तो १५ सप्टेंबरच्या आसपास किंवा त्यानंतर परत फिरण्याची शक्यता आज जाणवते. वातावरणीय निरीक्षणा नंतरच त्याच्या तारखे संबंधी घोषणा होवु शकते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading