📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 18, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

येत्या २ दिवसात नैऋत्य मान्सून निरोप घेण्याची शक्यता !

जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, नैऋत्य मान्सून पुढील दोन दिवसांत पूर्णतः परतणार असून महाराष्ट्रात २० ऑक्टोबरपर्यंत तुरळक-मध्यम पावसाची शक्यता आहे.

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

प्रश्न – परतीच्या प्रवासात नैऋत्य मान्सून कोठे पर्यंत पोहोचला आहे ?

माणिकराव खुळे – नैऋत्य मान्सूनने आज त्याच्या परतीच्या प्रवासात पुढील मजल गाठून आता केवळ तेलंगणा, छत्तीसगड व ओरिसा अश्या तीन राज्यातून त्याला बाहेर पडावयाचे आहे. मान्सूनची आजची सीमा रेषा कारवार, कलबुर्गी, निझामाबाद, कांकर, चांदबली ह्या शहरातून जात आहे. देशाच्या एकूण परतीच्या  क्षेत्रापैकी ९५ टक्के भागातून मान्सून परतलेला आहे.
            दरवर्षी मान्सून साधारणत: देशातून सरासरी १५ ऑक्टोबरच्या दरम्यान बाहेर पडतो. येत्या दोन दिवसात देशाच्या उर्वरित ५ टक्के भुभागावरून आपला पाय काढता घेईल, असे वाटते.

प्रश्न – ईशान्य (हिवाळी) मान्सूनची सुरवात कधी होणार ?

माणिकराव खुळे – येत्या दोन दिवसात नैऋत्य मान्सून निरोप घेताच, देशाच्या दक्षिणेतील राज्यात ईशान्य (हिवाळी) मान्सून ला सुरवात होण्याची शक्यता जाणवते.

प्रश्न – उर्वरित ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील पावसाची स्थिती काय असेल?
               
माणिकराव खुळे – अजुन ऑक्टोबरचा अर्धा महिना शिल्लक असुन ह्या अर्ध्या महिन्यात, पावसाच्या शेवटच्या दोन आवर्तनातून महाराष्ट्रात रब्बीला लाभदायक ठरेल अश्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते.  बुधवार दि. १५ ऑक्टोबर ते सोमवार दि. २० ऑक्टोबर ( नरक चतुर्दशी) दरम्यानच्या सहा दिवसात महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम ते किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यातही बुधवार-गुरुवार दि. १५-१६ ऑक्टोबर या दोन दिवशी पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल.

प्रश्न – अर्ध्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात जिल्हानिहाय पावसाची स्थिती काय असेल?

माणिकराव खुळे –

बुधवार दि.१५ ऑक्टोबर –

चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, पुणे,  सातारा, सांगली, कोल्हापूर

गुरुवार दि.१६ऑक्टोबर –

जळगांव, धुळे, नाशिक, अहिल्या नगर, पश्चिम छ सं नगर पूर्व, अमरावती,  बुलढाणा, अकोला, सह्याद्री घाटमाथा  व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

शुक्रवार दि.१७ ऑक्टोबर – 

बुलढाणा, धुळे, नाशिक, सह्याद्री घाटमाथा सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,  छत्रपती संभाजी नगर, हिंगोली  

शनिवार दि. १८ ऑक्टोबर –

सह्याद्री घाटमाथा अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव

रविवार -सोमवार दि.१९-२० ऑक्टोबर –

सह्याद्री घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगर,  छ सं नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणी,अकोला, चंद्रपूर, गडचिरोली

मंगळवार दि.२१ ऑक्टोबर –

मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ

Related posts

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावरचा उत्तम ग्रंथ

खस्ता खाल्लेल्या माणसांची चिंतनशील कविता

बहावाची भाजी कशी करायची ?

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406