March 3, 2026
Visit the fliif Reader download page

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
Artificial Intelligence transforming healthcare in India through digital diagnostics and smart medical technology.
Home » आरोग्यक्रांती की रोजगारसंकट ? एआयसमोर उभे वैद्यकीय क्षेत्र
संशोधन आणि तंत्रज्ञान

आरोग्यक्रांती की रोजगारसंकट ? एआयसमोर उभे वैद्यकीय क्षेत्र

आरोग्यसेवेत एआयचा उपयोग अपरिहार्य

आरोग्यसेवेत एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता) रोगाचे अचूक निदान करून, त्यावर योग्य औषधाचा शोध घेऊन आणि मशीन लर्निग व डेटा विश्लेषणव्दारे रुग्णांवर उपचार पद्धतीत अमुलाग्र बदल करत आहेत. आरोग्य सेवेत, एकाबाजूला एआय सर्वोत्तम व जलद रित्या रुग्णांवर उपचार करण्यात उपयोगी पडत असताना, दुसरीकडे या सेवेतील बरेचशे कामे मानव विरहित होत असल्याने, रोजगारात घट होईल काय, हा मिलियन डॉलर प्रश्न पण मनात येणे स्वाभाविक आहे.

प्रा. डॉ. संजय त्रिंबकराव खडक्कार,
माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ.
मोबाईल क्रमांक: 7276614260

आज, रोग शोधण्यात व त्याचे निदान करण्यात एआय उपयुक्त ठरत आहे. एआयला मनुष्याप्रमाणे कधीही विश्रांतीची आवश्यक नसते. त्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांचे चोवीस तास निरिक्षण करून काही जोखीम असल्यास डॉक्टरांना सतर्क करण्यासाठी मशीन लर्निंग मॉडेलचा वापर केला जाऊ शकतो. एआय वैद्यकीय उपकरणातून डेटा गोळा करून अधिक जटिल परिस्थिती शोधू शकतो. वैद्यकीय इमेजिंग मध्ये एआय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यात तसेच रुग्णाच्या इतिहासातील महत्त्वाच्या बाबींचा शोध घेऊन डॉक्टरांना अधिक योग्य निर्णय घेण्यात एआय मदतगार ठरू शकतो.

एआय नवीन औषधे विकसित करण्याचा खर्च कमी करू शकतो व नवीन आशादायक औषध संयोजन (ड्रग्स कॉम्बिनेशन) शोधण्यास उपयुक्त ठरू शकतो. आजार झाल्यावर रुग्णांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यांच्या मुलभूत प्रश्नांची उत्तरे हे चॅटबॉट्सव्दारे त्यांना चोवीस तासात केव्हाही व कोठेही मिळू शकतात. त्यामुळे आरोग्याबाबत सतर्क राहण्यास, त्यांना धीर मिळण्यास मदत होऊ शकते.

आरोग्य क्षेत्रात एआय उपयुक्तता निर्विवाद असली तरी त्यात काही धोके पण संभवतात. वैद्यकीय फाइल्स हॅक करणे, रुग्णांच्या बाबतीत असलेला डेटाचा गैरव्यवहार, डेटा संकलनात जाणून बुजून किंवा अवधानाने केलेल्या चुका, एआयच्या अंमलबजावणीतच संभाव्य धोका, औषधांमध्ये चुकीचा एआय अल्गोरिदमचा विकास, एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अप्रशिक्षित मनुष्यबळ, आणि विविध वैद्यकीय परीक्षा व चाचण्यांची जागा घेण्याची एआयची संभाव्य क्षमता इत्यादी घोक्यांना सामोरे जावे लागू शकते. एआय मानवी बुद्धिमत्तेपेक्षा अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता पण भविष्यात उद्भवू शकते. परंतु जरी एआय मध्ये डेटा जलद आणि अचूकपणे विश्लेषण करण्याची क्षमता आहे तरी पण मानवी डॉक्टरांनी प्रदान केलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचा आणि सहानुभूतीचा अभाव त्यात निश्चितच राहील. आजाराच्या दरम्यान रुग्णांना वैद्यकीय उपचारांसोबत भावनिक आधार पण महत्त्वाचा असतो जो एआय देऊ शकतच नाही.

एआयमुळे जरी वैद्यकीय माहिती मिळविणे अत्यंत सोपे झाले असले तरी ही माहिती नेहमीच योग्यरित्या सत्तापित केली जाईलच हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात एआय मानव जातीसाठी फायदेशीर व अनुकूल आणि वैद्यकीय नीतिमत्ता जपणारा असण्याचे प्रयत्न होतील यात शंका नाही.

वैद्यकीय क्षेत्रातील एआय जगभरातील आरोग्य सेवांमध्ये समानता वाढवविण्याऐवजी तांत्रिकदृष्ट्या प्रगत देश आणि डिजिटल सुविधा नसलेल्या देशांमधील दरी वाढवू शकतो. तसेच आरोग्य सेवेत एआय तरी लक्षणीय सुधारणा करू शकेल तरी त्याचा खर्च खूप जास्त असल्याने लहान रुग्णालय किंवा क्लिनिक साठी हा खर्च परवडणे अशक्य बाब असू शकते.

एआय वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय व्यवहारावर गंभीर परिणाम करू शकतो. त्यामुळे वैद्यकीय संस्थांनी व शैक्षणिक संस्थांनी या बदलांवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांचे अभ्यासक्रम त्या अनुरुप बदलले पाहिजे. भविष्यात एआयने विविध वैद्यकीय क्षेत्रात प्रभुत्व मिळवल्यास आरोग्य व्यवसायकांमध्ये काही प्रमाणात बेरोजगारीचे सावट अधिक गडद होऊ शकते. तसेच डॉक्टर यावर जास्त अवलंबून राहू लागल्यास, गंभीर विचारसरणी, क्लिनिकल निर्णय आणि समस्या सोडवण्याची त्यांची क्षमता त्यामुळे कमी होऊ शकते. एकीकडे ऑटोमेशनमुळे कार्यक्षमता तर सुधारेल परंतु दुसरीकडे तंत्रज्ञ व इतर व्यवसायिकांची मागणी कमी होऊ शकते. त्यामुळे बेरोजगारी सोबत लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात.

भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (आयटी कायदा), डेटा गोपनीयता आणि सुरक्षिततेचे नियमन करते, जिथे एआय संवेदनशील आरोग्य माहिती वापरते किंवा सामायिक करते. तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नियमन, (पूर्वी भारतीय वैद्यकीय परिषद आचारसंहिता) व्यावसायिक मानके निर्धारित करते.परंतु सध्या एआयवर स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांचा अभाव आहे.व्यापक नियामक चौकटी असूनही, भारतीय आरोग्यसेवेमध्ये एआयच्या कायदेशीर परिणामांना थेट संबोधित करणारा कोणताही भारत-विशिष्ट कायदा नाही. यामुळे एक महत्त्वपूर्ण पोकळी निर्माण होते आणि डॉक्टरांना अनिश्चित जोखीम आणि संभाव्य खटल्यांना सामोरे जावे लागते.

एकीकडे आरोग्य क्षेत्रात एआयमुळे नोकऱ्या जाण्याची संभावना व्यक्त होत असताना डेटा सायन्स, बायोइन्फॉरमॅटिक्स, आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थापन यात नवीन रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.जागतिक स्तरावर,आरोग्य क्षेत्रात,सन २०३० पर्यंत २ ते ५ करोड नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षित आहे.

डेलॉइटच्या अहवालानुसार, आरोग्यसेवेतील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वर्ष २०२५ पर्यंत भारताच्या जीडीपीमध्ये २५-३० अब्ज अमेरिकन डॉलर्सचे योगदान देईल असा अंदाज होता, ज्यामुळे सुलभता, निदान आणि उपचारांचे परिणाम वाढतील.

भारताची डिजिटल हेल्थकेअर परिसंस्था वेगाने प्रगती करत आहे, एआय-संचालित निदान, मेडटेक नवोपक्रम आणि डिजिटल आरोग्य रेकॉर्ड रुग्णसेवेत बदल घडवून आणत आहे. भारताने आरोग्य सेवेत एआयच्या क्षमतांचा फायदा घेऊन,त्याचबरोबर काळजीच्या मानवी पैलूंचे जतन करणे यामध्ये योग्य संतुलन शोधणे महत्त्वाचे ठरते. तथापि, त्याच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी,या क्षेत्राला नियामक संरेखन, कर्मचारी प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या मर्यादा यासारख्या आव्हानांवर मात करावी लागेल. लक्ष्यित गुंतवणूक आणि केंद्रित धोरणात्मक प्रगतीसह, भविष्यात भारत एआय-संचालित आरोग्यसेवेत जागतिक नेता बनू शकतो,यात शंका नाही.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

शेती अन् निसर्गप्रेमी राजा राजर्षी शाहू

वर्डप्रेसच्या मराठी व्हर्जनची सुरूवात कोल्हापुरातून…

एक विलक्षण सुन्न करणारं आत्मकथन…

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading