March 15, 2026
Visit the fliif Reader download page

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
"Dark clouds gather over rural Maharashtra as unseasonal rain lashes the region – 15 to 20 day weather alert issued"
Home » महाराष्ट्रात पुढील १५ ते २० दिवस अवकाळीचे वातावरण
गप्पा-टप्पा शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात पुढील १५ ते २० दिवस अवकाळीचे वातावरण

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

प्रश्न – केरळमध्ये मॉन्सून कधी दाखल होईल ?

माणिकराव खुळे – केरळात मान्सून २३ ते ३१ मे दरम्यान कधीही केरळात दाखल होवु शकतो. सध्या अंदमान व आग्नेय बंगाच्या उपसागरात दाखल झालेला मॉन्सून चांगला कोसळत आहे. त्याच्या पुढील वाटचालीस  वातावरण अनुकूल तयार होत आहे.

प्रश्न – महाराष्ट्रातील पाऊस व पेरणी पूर्व मशागती कामाबद्दल कृषी सल्ला ?

माणिकराव खुळे – आजपासुन पुढील १५ ते २० दिवस म्हणजे ३१ मे पर्यन्त म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत,  मुंबई सह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सूनपूर्व (मान्सून चा नव्हे) वीजा, वारा वावधनासहितचा केवळ मान्सूपूर्व अवकाळी पावसाची शक्यता आहे.
                  त्यातूनच कदाचित महाराष्ट्रात पेरणपूर्व शेतीच्या मशागती करण्याची संधी मिळू शकते. शेतकऱ्यांनी, त्यामुळे लक्ष ठेवून, आवश्यक असलेल्या खरीप पेरणीपुर्व मशागती करण्याच्या तयारीत असण्यास हरकत नाही, असे वाटते.
           टोमॅटो लागवडी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी ह्याची नोंद घ्यावी असेही येथे सुचवावे वाटते. परंतु तो निर्णय हा स्वतचाच असावा.

प्रश्न – महाराष्ट्रातील तापमाने कशी राहतील ?

माणिकराव खुळे – अवकाळीच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच असुन, अश्याच पद्धतीने राहण्याची शक्यता जाणवते.
              अर्थात  ४-५ दिवसासाठी तापमानात थोडी काहीशी चढ-उतार जरी जाणवली तरी, एकंदरीत उर्वरित मे महिन्यात, दिवसाची उष्णता व रात्रीचा उकाडा हा महाराष्ट्रात विशेष जाणवणार नाही, असेच वाटते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

भुंगे: शेतीचे अदृश्य शिल्पकार, संवर्धनाची तातडीची गरज

हवामान बदलाच्या परिस्थितीत शाश्वत शेतीसाठी ‘हायड्रोपोनिक्स’ तंत्रज्ञान उपयुक्त : जिल्हाधिकारी अमोल येडगे

विश्वभारती चळवळः हवा प्रदूषणावरचा लढा आजच्या पिढीसाठी नव्हे तर, उद्याच्या श्वासासाठी

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading