आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
प्रश्न – केरळमध्ये मॉन्सून कधी दाखल होईल ?
माणिकराव खुळे – केरळात मान्सून २३ ते ३१ मे दरम्यान कधीही केरळात दाखल होवु शकतो. सध्या अंदमान व आग्नेय बंगाच्या उपसागरात दाखल झालेला मॉन्सून चांगला कोसळत आहे. त्याच्या पुढील वाटचालीस वातावरण अनुकूल तयार होत आहे.
प्रश्न – महाराष्ट्रातील पाऊस व पेरणी पूर्व मशागती कामाबद्दल कृषी सल्ला ?
माणिकराव खुळे – आजपासुन पुढील १५ ते २० दिवस म्हणजे ३१ मे पर्यन्त म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, मुंबई सह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सूनपूर्व (मान्सून चा नव्हे) वीजा, वारा वावधनासहितचा केवळ मान्सूपूर्व अवकाळी पावसाची शक्यता आहे.
त्यातूनच कदाचित महाराष्ट्रात पेरणपूर्व शेतीच्या मशागती करण्याची संधी मिळू शकते. शेतकऱ्यांनी, त्यामुळे लक्ष ठेवून, आवश्यक असलेल्या खरीप पेरणीपुर्व मशागती करण्याच्या तयारीत असण्यास हरकत नाही, असे वाटते.
टोमॅटो लागवडी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी ह्याची नोंद घ्यावी असेही येथे सुचवावे वाटते. परंतु तो निर्णय हा स्वतचाच असावा.
प्रश्न – महाराष्ट्रातील तापमाने कशी राहतील ?
माणिकराव खुळे – अवकाळीच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच असुन, अश्याच पद्धतीने राहण्याची शक्यता जाणवते.
अर्थात ४-५ दिवसासाठी तापमानात थोडी काहीशी चढ-उतार जरी जाणवली तरी, एकंदरीत उर्वरित मे महिन्यात, दिवसाची उष्णता व रात्रीचा उकाडा हा महाराष्ट्रात विशेष जाणवणार नाही, असेच वाटते.
