📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 6, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात पुढील १५ ते २० दिवस अवकाळीचे वातावरण

"Dark clouds gather over rural Maharashtra as unseasonal rain lashes the region – 15 to 20 day weather alert issued"

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

प्रश्न – केरळमध्ये मॉन्सून कधी दाखल होईल ?

माणिकराव खुळे – केरळात मान्सून २३ ते ३१ मे दरम्यान कधीही केरळात दाखल होवु शकतो. सध्या अंदमान व आग्नेय बंगाच्या उपसागरात दाखल झालेला मॉन्सून चांगला कोसळत आहे. त्याच्या पुढील वाटचालीस  वातावरण अनुकूल तयार होत आहे.

प्रश्न – महाराष्ट्रातील पाऊस व पेरणी पूर्व मशागती कामाबद्दल कृषी सल्ला ?

माणिकराव खुळे – आजपासुन पुढील १५ ते २० दिवस म्हणजे ३१ मे पर्यन्त म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत,  मुंबई सह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सूनपूर्व (मान्सून चा नव्हे) वीजा, वारा वावधनासहितचा केवळ मान्सूपूर्व अवकाळी पावसाची शक्यता आहे.
                  त्यातूनच कदाचित महाराष्ट्रात पेरणपूर्व शेतीच्या मशागती करण्याची संधी मिळू शकते. शेतकऱ्यांनी, त्यामुळे लक्ष ठेवून, आवश्यक असलेल्या खरीप पेरणीपुर्व मशागती करण्याच्या तयारीत असण्यास हरकत नाही, असे वाटते.
           टोमॅटो लागवडी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी ह्याची नोंद घ्यावी असेही येथे सुचवावे वाटते. परंतु तो निर्णय हा स्वतचाच असावा.

प्रश्न – महाराष्ट्रातील तापमाने कशी राहतील ?

माणिकराव खुळे – अवकाळीच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच असुन, अश्याच पद्धतीने राहण्याची शक्यता जाणवते.
              अर्थात  ४-५ दिवसासाठी तापमानात थोडी काहीशी चढ-उतार जरी जाणवली तरी, एकंदरीत उर्वरित मे महिन्यात, दिवसाची उष्णता व रात्रीचा उकाडा हा महाराष्ट्रात विशेष जाणवणार नाही, असेच वाटते.

Related posts

तारेवरची लांडोर : शिवाजी विद्यापीठ परिसरातील भारतीय मोरनीचे अस्तित्व आणि पक्षीसंवर्धनाची नवी दिशा

भारतातील फुलपाखरे आणि पतंग (लेपिडोप्टेरा) वर सचित्र मार्गदर्शक पुस्तिका

मलबार पालक अष्टपैलू पालेभाजी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406