आदिष्टीला जाताना आणि येताना प्रसाद म्हणतच होता की यावर्षी तुम्हाला अमूर नक्की मिळणार. मंगलही फोनवर म्हणाली होती की तू बाहेर पड, तुला नक्की अमूर मिळेल. इतरांना विश्वास होता, मात्र मलाच स्वतःवर विश्वास नव्हता, पण अखेर मिळालाच फोटो. आणि तिला पकडलंच शेवटी…. माझ्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये….
नेत्रा पालकर – आपटे
अमूर ससाणा हा पक्षी त्याच्या देशोदेशीच्या प्रवासामुळे आणि मान्सूनच्या वाऱ्यांसोबतच्या उड्डाणांमुळे आधीच सेलि ब्रेटी बनला आहे. तो चीन, मंगोलिया आणि रशिया या देशांत त्याची वीण करतो. त्याचं नाव आहे- अमूर फाल्कन. फाल्कन म्हणजे ससाणा आणि अमूर हे एका नदीचं नाव आहे. ही नदी चीन आणि रशियामधून वाहते. या नदीच्या परिसरात हा पक्षी आढळतो, म्हणून त्याचं हे नाव आहे.
हा अमूर ससाणा चीन, मंगोलिया, रशिया अशा देशात वीण करून भारताच्या दिशेनं आणि मग पुढे आफ्रिकेपर्यंत स्थलांतर करतो. इतर स्थलांतरीत पक्ष्यांप्रमाणे तो भारतात काही काळ मुक्कामी राहत नाही. तो भारताच्या मार्गानं प्रवास करतो, म्हणून आपल्यासाठी तो ‘पॅसेज मायग्रंट’ आहे. ईशान्येकडचं नागालँड हे राज्य जगभरातल्या ससाण्यांची राजधानी आहे, असं म्हटलं जातं. इथल्या डोंगरदऱ्या आणि त्यावरचं आभाळ लाखो ससाण्यांनी गजबलेलं असतं. मणिपूर, मेघालय या राज्यांतही या ससाण्यांचे मोठे अधिवास आहेत. जेव्हा नैऋत्य मोसमी वारे क्षीण होतात म्हणजे आपल्याकडचा पाऊस कमी होतो आणि ईशान्य मोसमी वारे वाहू लागतात, त्या काळात नागालँड, मणिपूरमध्ये वाळवीच्या झुंडीच्या झुंडी पाहायला मिळतात.
अमूर ससाणे हे कीटकभक्षी आहेत आणि या मार्गात मोठ्या प्रमाणात वाळवीचा उद्रेक होत असल्याने ते त्यावर ताव मारतात. या खाद्यातून त्यांना पुढे पुढे उड्डाण करण्याची ऊर्जा मिळते. एखादं मोठ्या पल्ल्याचं विमान मध्ये थांबून इंधन भरून घेतं, तसंच आहे हे !
या मार्गात ते वाऱ्याच्या वेगासोबत त्यांचा वेग जुळवून घेतात. ते एरव्ही ४५ कि मी प्रति तास एवढ्या वेगाने उडत असतील, तर या काळात ते २० कि मी प्रति तास एवढ्याच वेगाने उडतात. कारण वाऱ्याचा वेग तेवढाच असतो. आफ्रिकेतून परतीचा प्रवास करतानाही ते एप्रिल – मे महिन्यातल्या उष्ण वाऱ्यांचा सहारा घेतात. या प्रवासात मात्र ते भारतात नागालँड, मणिपूर या राज्यांत थांबत नाहीत. कारण या काळात त्यांचं आवडतं वाळवीचं खाद्य त्यांच्यासाठी उपलब्ध नसतं. हे पक्षी हवेचा रोख कसा आहे, ते चाणाक्षणपणे ताडतात. ते चक्रीवादळासारख्या आपत्तींचा अदमास लावू शकतात, हे विलक्षण आहे. ते नुसता अंदाजच लावत नाहीत, तर वाऱ्याच्या दिशेचा फायदा उठवून आपली मार्गक्रमण करतात हे महत्त्वाचं !
चीनमध्ये होते वीण चीन, मंगोलिया या देशात अमूर ससाण्यांच्या विणीच्या जागा आहेत. त्यांच्या या अधिवासांवर आता वाढती शेती, नागरीकरण याचा घाला आला आहे. या सगळ्याचा त्यांच्या विणीवर आणि संख्येवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करावा लागेल. चीनमधल्या मांचुरियामधल्या गवताळ प्रदेशात या ससाण्यांचा अधिवास आहे. इथे दिवस १५ ते १६ तासांचा असतो. तापमान उच्चांकी असतं. अशा स्थितीत त्यांना जास्त खाद्य मिळतं आणि विणीच्या दिवसांत ते फार आवश्यक असतं. उन्हाळ्यात अशी अनुकूल स्थिती असणाऱ्या याच प्रदेशात कडाक्याचा हिवाळा असतो. दि वस आक्रसत जातो आणि गोठणाऱ्या तापमानासोबत खाद्याची उपलब्धता कमी कमी होत जाते. त्यामुळे या भागातले पक्षी दक्षिणेकडे प्रवास सुरू करतात, पण तिकडचा कडाक्याचा हिवाळा टाळण्यासाठी अमूर ससाणे असे विषुववृत्ताच्या आसपास स्थलांतर करतात. त्यामुळेच हा पक्षी कधीच हिवाळा बघत नाही. तो नेहमी उन्हाळा अनुभवतो, असं पक्षीतज्ज्ञ म्हणतात. त्यांच्या या कौशल्यामुळेच अमूर ससाणे पृथ्वीतलावर एवढ्या मोठ्या संख्येनं राहण्यात यशस्वी झाले आहेत.
अखेर मी तिला टिपलचं…
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून केलेले प्रयत्न, मारलेल्या चकरा, आशा -निराशेच्या हिंदोळ्यावर झुललेले मन, मी सोडून बाकीच्यांनाच माझ्याविषयी वाटणारा विश्वास… आणि मग इच्छापूर्तीचा तो क्षण….
ही गोष्ट आहे talk of the world बनलेल्या अमूर ससाण्याला बघण्याची आणि त्याचे/तिचे फोटो काढण्याची. हा पक्षी त्याच्या देशोदेशीच्या प्रवासामुळे आणि मान्सूनच्या वाऱ्यांसोबतच्या उड्डाणांमुळे आधीच सेलिब्रेटी बनला आहे. तो चीन, मंगोलिया आणि रशिया या देशांत त्याची वीण करतो. त्याचं नाव आहे – अमूर फाल्कन. तो भारताच्या मार्गा नं प्रवास करतो, म्हणून आपल्यासाठी तो ‘पॅसेज मायग्रंट’ आहे.
दरवर्षी हे पक्षी काही काळासाठी रत्नागिरीत थांबतात आणि मग इथल्या पक्षीप्रेमी आणि बर्ड र्ड फोटोग्राफर्सना यांना बघण्याची आणि त्यांचे फोटो काढण्याची संधी मिळते. मी याआधी याचे फोटो काढणं तर लांबच, पण साधं लांबून बघितलंही नव्हतं. यावर्षी 3 वेळा आदिष्टी, 3 वेळा चंपक पिंजून काढूनही याचे दर्शन झाले नव्हते. मी जाऊन आल्यावर दुसऱ्याच दिवशी आमच्या ग्रुपमधल्या इतर फोटोग्राफर्सना याचे फोटो मिळत होते. मग मी टोटल ड्रामा क्वीन बनून… “माझं लकच नाही पक्ष्यांच्या बाबतीत, मी जाते तेव्हा हे दिसतच नाहीत… मी काय यांचं घोडं मारलंय” वगैरे वगैरे सगळे डायलॉग्ज मारून झाले… बाकीच्यांनी याचे काढलेले फोटो बघून ‘मन धावतया तुझ्याचसाठी, डोलतया तुझ्याचसाठी’ अशी अवस्था झालेली. पण मला मात्र दर्शनही नाही आणि फोटोही नाही.
काल साधारण पावणे पाचच्या दरम्यान प्रसाद गोखलेचा फोन आला की मी जातोय आदिष्टीला, तुम्ही येताय का…? बघू काही मि ळतंय का. लगेच तयार होऊन निघाले. 5 ते 6 वेळा आदिष्टीला फिरलो. लांssssब कुठेतरी एक अमूर घिरट्या घालताना दिसला आणि त्याहून लांब निघून गेला. पदरी पुन्हा निराशा. आदिष्टीला जाताना आम्हाला चंपकजवळ ईजिप्शियन गिधाड दिसलं. 2 वर्षांनंतर पुन्हा हे रत्नागिरीत दिसून आलं काल. पण कावळ्यांनी त्याला आमच्यापासून खूप म्हणजे खूपच लांब पळवून लावलं. मग आम्हीही आदिष्टीला गेलो. परत येताना बऱ्यापैकी अंधार पडायला लागला होता. सूर्या स्तानंतर शेवटची काही किरणे पृथ्वीवर आपलं अस्तित्व दाखवून देत होती. जाताना जिथे गिधाड दि सलं, तिथे आम्ही पुन्हा थांबलो कारण प्रसाद मला सांगत होता की उजव्या हाताला जिथे कचरा फेकतात तिथे हे गिधाड सकाळच्या वेळी दिसू शकतं. हे तो बोलत असतानाच माझं लक्ष मात्र उजव्या हाताला असलेल्या एका झाडाकडे होतं. तिथे एक पक्षी बसला होता. मात्र तो against the light असल्याने आणि एकूणच उजेड कमी होत चाललेला असल्याने नक्की कुठला पक्षी ते प्रथमदर्शनी समजलं नाही. मी प्रसादला विचारलंच की हा कुठला पक्षी रे… मग तो रोलर की अमूर यावर आमच्यामध्ये चर्चा.
शेवटी प्रसादने त्याचा कॅमेरा काढलाच आणि त्यातून बघितल्यावर ती अमूर फिमेल आहे हे कळलं. हे म्हणजे अगदीच ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ झालं होतं. अख्खा आदिष्टीचा सडा फि रून आलो तरी न दिसलेला(ली) अमूर आम्हाला आता रस्त्याच्या जवळ असलेल्या एका झाडावर बसलेली दिसली. मग काय, जसे जमतील तसे फोटो काढून घेतले रेकॉर्ड र्ड शॉट म्हणून.
मग आमच्या स्कुटर, बॅग्ज, किल्ल्या आहेत तिथेच रस्त्यावरच टाकून आम्ही त्या अमूरला वळसा घालून जरा जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि मग अजून थोडे फोटो काढले. फार काही चांगले नाही मिळाले कारण अंधार पडायला लागला होता. त्यामुळे ISO वाढवावा लागला. फोटोमध्ये खूप noise. पण Post processing मध्ये बऱ्यापैकी क्लि र करता आला फोटो.
आदिष्टीला जाताना आणि येताना प्रसाद म्हणतच होता की यावर्षी तुम्हाला अमूर नक्की मिळणार. मंगलही फोनवर म्हणाली होती की तू बाहेर पड, तुला नक्की अमूर मिळेल. इतरांना विश्वास होता, मात्र मलाच स्वतःवर विश्वास नव्हता, पण अखेर मिळालाच फोटो. आणि तिला पकडलंच शेवटी…. माझ्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये….
अभि मन और लालची बन गया है… अभि मुझे broad daylight में इसकी एक अच्छि सी फोटो चाहीये….। कब मि लेगी…? मि लेगी ना…?
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
