October 25, 2025
मान्सूनने १४ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू केला. महाराष्ट्रात १४-१८ सप्टेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता, त्यात १४-१५ सप्टेंबरला अतिजोरदार पावसाचा इशारा.
Home » मान्सून परतला…
गप्पा-टप्पा शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मान्सून परतला…

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

              १-मान्सूनचा परतीचा प्रवास कसा राहील ?

माणिकराव खुळे : या वर्षी २४ मे २०२५ रोजी मान्सून  केरळ, तामिळनाडू व कर्नाटकात अश्या ३ राज्यात एकाच दिवशी प्रवेश करून देशात दाखल झाला होता. 
                देशात त्याने आजपर्यंत ११३ दिवस हजेरी लावून आज राजस्थानच्या वाळवंटाच्या, मारवाड भागातील श्री्गंगानगर बिकानेर नागौर फालुदी जैसलमेर जोधपूर बारमेर जिल्ह्यांच्या भागातून त्याच्या अपेक्षित सरासरी तारीख १७ सप्टेंबरच्या ३ दिवस अगोदरच त्याने आज रविवार १४ सप्टेंबरला माघारी फिरत, परतीच्या प्रवासास सुरवात केली आहे. परंतु अजुन साधारण पुढील महिनाभर त्याला देशात परतीचा प्रवास पूर्ण करावयाचा आहे. १५ ऑक्टोबर ह्या त्याच्या सरासरी तारखेदरम्यान देशातून निघून जावा, असे अपेक्षित असते.
             आणि त्यानंतर तो दक्षिणेकडील चार राज्यात  ईशान्य मान्सून म्हणून तो स्थिरावेल.

                 २-कोणत्या कसोट्यावर मान्सून परतीची घोषणा झाली?

           माणिकराव खुळे :       i) सलग गेले पाच दिवस त्या भागात हवेच्या शुष्क वातावरणाचे प्राबल्य वाढून पावसाची गतिविधिता थांबली.
                 ii)जमिनीपासून साधारण दिड किमी उंचीपर्यन्त हवेचे उच्च दाबाची प्रत्यावर्ती वाऱ्याची स्थिती निर्माण झाली.
               ii)हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण कमी होवून हवेतील सापेक्ष आर्द्रता टक्केवारी खालावली. 
               Iv )दिवसाच्या कमाल तापमानात वाढ व रात्रीचे किमान तापमानात घट जाणवू लागली. म्हणून तर काल श्री्गंगानगर येथे देशातील सर्वाधिक कमाल तापमान ३८ डिग्री से. ग्रेड होते.                                                                          v)आकाशातील निरभ्रता वाढली.

               ह्या पाच गोष्टींच्या निरीक्षणावरून मान्सून ने परतीच्या पावसास सुरवात केली ह्याची घोषणा झाली.

           ३-महाराष्ट्रातील पाऊस कसा राहील ?

            माणिकराव खुळे :  आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. १८ सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
              त्यातही आज सोमवार १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात अतिजोरदार पावसाची शक्यता अधिक जाणवते.
           शुक्रवार दि. १९ सप्टेंबर पासुन विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात पावसाचा जोर (तीव्रता)  पूर्णपणे नव्हे परंतु काहीसा कमी जाणवेल.   


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading