April 3, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
Chance of rain along with hail in Vidarbha
Home » विदर्भात पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विदर्भात पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता

सध्या महाराष्ट्रात थंडीचा कालावधी दिवसागणिक वाढत आहे. दिवसा उष्णता तर रात्री आणि पहाटे चांगलीच थंडी जाणवत आहे. किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने ही सध्य:काळातील सरासरी तापमानांच्या खाली घसरलेले असुन, किमान १२ ते १६ व कमाल ३२ डिग्री से.ग्रेड दरम्यान जाणवत आहे, म्हणून अजूनही थंडी टिकून आहे.                     

माणिकराव खुळे

विदर्भ –

२५ ते २९ फेब्रुवारी(रविवार ते गुरुवार ) पर्यंतच्या पाच दिवसात संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात ढगाळलेल्या वातावरणाबरोबर अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. त्यातही, २५ ते २७ फेब्रुवारी(रविवार ते मंगळवार)दरम्यानच्या पहिल्या तीन दिवसात विजा व गडगडाटासह मध्यम पावसाबरोबर गारपीट होण्याची शक्यताही आहे. विशेषतः अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली ह्या ५ जिल्ह्यात ही शक्यता अधिकच आहे.

मराठवाडा –

मराठवाड्यातील संपूर्ण ८ जिल्ह्यात उद्या दि.२५ ते २७ फेब्रुवारी(रविवार ते मंगळवार) तीन दिवस केवळ ढगाळ वातावरणच राहून गडगडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासहित अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः जालना हिंगोली परभणी व नांदेड ह्या ४ जिल्ह्यात ही शक्यता अधिकच जाणवते.

मध्य महाराष्ट्र –

२६ व २७ फेब्रुवारी (सोमवार – मंगळवार)  केवळ दोनच दिवस खान्देश, नाशिक, नगर, पुणे,  सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या १० जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी गडगडाटासह व सोसाट्याच्या वाऱ्यासहित तुरळक पावसाची शक्यता जाणवते. ही शक्यता जळगांव जिल्ह्यात अधिक आहे.

कोकण

मुंबईसह कोकणात मात्र पावसाची शक्यता नाही.आकाशही निरभ्र राहील. किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने ही सरासरीच्या खाली म्हणजे १६-१८ व ३० डिग्री से.ग्रेड दरम्यान राहून तेथील वातावरण आल्हादायकच जाणवेल.

महाराष्ट्रात थंडी कशी राहील

सध्या महाराष्ट्रात थंडीचा कालावधी दिवसागणिक वाढत आहे. दिवसा उष्णता तर रात्री आणि पहाटे चांगलीच थंडी जाणवत आहे. किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने ही सध्य:काळातील सरासरी तापमानांच्या खाली घसरलेले असुन, किमान १२ ते १६ व कमाल ३२ डिग्री से.ग्रेड दरम्यान जाणवत आहे, म्हणून अजूनही थंडी टिकून आहे. थंडी आपला हंगामी कार्यकाळ पूर्ण करून सध्या जाणवत असलेल्या पाणी टंचाईच्या काळात थंडीमुळे रब्बी शेत-पिकांना नकळत काहींशी मदतच मिळत आहे, असे वाटते.

Related posts

उसाच्या रसातील साखरेचे अचुक अन् जलद प्रमाण मोजण्याचे तंत्रज्ञान समीर संशोधन संस्थेकडून हस्तांतरित

बांबू चारकोलवरील निर्यातबंदी हटवण्याचा खादी ग्रामोद्योग आयोगाचा प्रस्ताव

पुढील पाच दिवस पावसाची उघडीप

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!