February 19, 2026
Visit the fliif Reader download page

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
God in Every living thing
Home » प्रत्येक सजिवात देवत्वाची अनुभुती
विश्वाचे आर्त

प्रत्येक सजिवात देवत्वाची अनुभुती

नव्या युगात अनेक शोध लागले आहेत, पण अद्याप आत्मा देहात येतो कसा आणि जातो कसा, हे कोणी शोधू शकले नाही. त्याला पकडून ठेवणे कोणाला अद्याप जमले नाही. ते मानवाच्या हातात नाही. ती हाताबाहेरची गोष्ट आहे. याचाच अर्थ येथे देवाचे अस्तित्व आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें । जाणणे जें निरूतें ।
ज्ञान ऐसें तयातें । मानूं आम्ही ।। ९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जें यथार्थ जाणणें, त्याला ज्ञान असे आम्ही समजतों.

शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते. म्हणजे देहाला क्षेत्र म्हटले जाते. या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणावे. क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे, त्याला ज्ञान असे समजावे. देह आणि आत्मा वेगळा आहे. या देहात आत्मा आला आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचा देह हा पंचमहाभूतापासून बनला आहे. फक्त प्रत्येकाच्या देहाची रचना वेगवेगळी आहे.

कुणाचा देह गोरा आहे, तर कुणाचा काळा आहे. कोण दिसायला कुरूप आहे, तर कोण दिसायला अति सुंदर असते. हे सर्व बाह्य रंग आहेत, पण या देहात असणारा आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे. तो एक आहे. आत्मा हा अमर आहे. देह नाशवंत आहे. वयोमानानुसार देहाची स्थिती बदलते, पण आत्मा बदलत नाही. जन्माच्या वेळी तो देहात येतो. मृत्यूवेळी तो देहातून मुक्त होतो. आत्म्याचे हे ज्ञान ज्याला अवगत झाले तो आत्मज्ञानी.

नव्या युगात अनेक शोध लागले आहेत, पण अद्याप आत्मा देहात येतो कसा आणि जातो कसा, हे कोणी शोधू शकले नाही. त्याला पकडून ठेवणे कोणाला अद्याप जमले नाही. ते मानवाच्या हातात नाही. ती हाताबाहेरची गोष्ट आहे. याचाच अर्थ येथे देवाचे अस्तित्व आहे. हे देवत्व प्रत्येक सजीवाच्या ठिकाणी आहे. म्हणूनच प्रत्येक जण आत्मज्ञानी होऊ शकतो आणि प्रत्येकाने आत्मज्ञानी होण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. यासाठी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायला हवा. हे शास्त्र जाणून घ्यायला हवे.

हे शास्त्र प्रत्येक धर्मात सांगितले आहे. म्हणूनच सर्व धर्म सारखेच आहेत. सर्वांचा हेतू एकच आहे. फक्त प्रत्येक धर्माच्या रीती वेगळ्या आहेत. वाटा वेगळ्या आहेत. तरी शेवटी त्या एकाच ठिकाणी जातात. आत्मज्ञानी होणे, हाच सर्वांचा हेतू आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

प्राजक्ता माळीला माधुरी पवारने दिल्या अशा शुभेच्छा…

Saloni Art : असे तयार करा कागदी पुलांचे बुके…

रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading