December 17, 2025
महाराष्ट्रात परतीचा पाऊस ३ ऑक्टोबरपर्यंत स्थिर राहणार. काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता, पुरजन्य परिस्थितीचा धोका आणि दसऱ्यानंतर आंशिक उघडीप.
Home » परतीच्या मार्गावरील मान्सून सप्ताहभर जाग्यावरच थबकणार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

परतीच्या मार्गावरील मान्सून सप्ताहभर जाग्यावरच थबकणार

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

                   १-परतीचा पाऊस  जाग्यावरच स्थिर –

                      महाराष्ट्रातील सध्य:स्थितीतील तीव्र वातावरणीय प्रणालीमुळे देशात परतीच्या मार्गांवर असलेला मान्सून, शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पर्यन्त, वेरावळ, भरूच, उज्जैन, झाशी, शहाजहाणपूर ह्या शहरादरम्यानच्या सीमारेषेवर मान्सून सप्ताहभर जाग्यावरच थबकण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी वातावरण पूरकतेची शक्यता टिकून राहू शकते.

                  २-हवेच्या तीव्र  कमी दाबात रूपांतर-

                  अपेक्षित असलेल्या कमी दाबाचे आज पहाटे तीव्र  कमी दाबात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत अपेक्षित असलेल्या जोरदार पावसाला ही प्रणाली पूरक ठरण्याची शक्यता कायम जाणवते.

                   मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार
       
                      हवेच्या तीव्र  कमी दाब वातावरण प्रणालीच्या नेमक्या प्रभावी टप्प्यात सापडलेल्या दक्षिण मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच सोलापूर जिल्हा क्षेत्रात मंगळवार दि. ३० सप्टेंबर पासुन २-३ दिवस पावसासाठी काहीशी उघडीप मिळू शकते असे वाटते.
                       

                   ३-पूरजन्य परिस्थितीची शक्यता

                      संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व जळगांव, नाशिक, अहिल्यानगर व सोलापूर अश्या महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात, मंगळवार दि. ३० सप्टेंबर पर्यंतच्या ४ दिवसात पूरजन्य परिस्थितीची शक्यता जाणवत असुन धरण क्षेत्रातून नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता जाणवते.
               

                    ४-अंदमानजवळ तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आता वायव्येकडे सरकणार-

     
                      मंगळवार दि. ३० सप्टेंबर दरम्यान अंदमानजवळ बंगाल उप सागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार  होण्याची शक्यता व  त्याचे  उत्तर व उत्तर मध्य भारताकडे होण्याच्या मार्गक्रमण शक्यतेतून महाराष्ट्रात दि. ८ ते ९ ऑक्टोबर दरम्यानच्या पावसाच्या चौथ्या आवर्तनाच्या  धोका  कमी जाणवतो, असे वाटते.                  

                    ५-दसऱ्यानंतर उघडीपीची शक्यता-

                     शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पासुन महाराष्ट्रात पूर्णतः नव्हे परंतु काहीशी उघडीपीची शक्यता जाणवते. मुंबईत मात्र दसऱ्यानंतरही पावसाची शक्यता कायम जाणवते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading