March 29, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
कणकवलीतील साहित्य-संगीत संमेलनातील कविसंमेलनाचे दृश्य
Home » विद्रोहा बरोबर प्रेमाचाही गारवा !
काय चाललयं अवतीभवती

विद्रोहा बरोबर प्रेमाचाही गारवा !

साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन बहरले

राजापूर, दोडामार्ग ते वैभववाडी दूरच्या भागातील कवींचीचा सहभाग

कणकवली : शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या साहित्य – संगीत संमेलनातील कविसंमेलन विशेष लक्षवेधी ठरले. ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात कवींनी निसर्ग, सामाजिक जाणीव आणि राजकीय कोंडी अशा विविध विषयांवर आपल्या कवितांमधून मनमोकळे भाष्य केले. विद्रोहाच्या तीव्र सूरांना प्रेमाच्या हलक्या-फुलक्या किस्स्यांची जोड देत कवींनी उपस्थित रसिकांचे मन जिंकले. वय झाले तरी ‘प्रेमाने वेणीत गजरा माळायला अजूनपर्यंत कोणी मिळालाच नाही’ अशी कविता सादर करत कवयित्री दर्शना पाताडे यांनी मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी मिळत नसल्याची आजच्या विवाहसंस्थेतील समस्या प्रभावीपणे उलगडून दाखवली.

राजापूर, दोडामार्ग, बांदा, वैभववाडी, मालवण, देवगड अशा दूर दूरच्या भागातून सुमारे 50 कवी या कवी संमेलना सहभागी झाले होते. आपल्या कवितातून वेगवेगळ्या आपल्या भावना प्रगट करताना कवीनी आपल्यातील माणुसकीचे ही दर्शन घडविले. कवयित्री निशिगंधा गावकर यांनी याबाबत आपल्या कवितेतून भाष्य करताना ‘माणुसकीचे जपून नाते माणूस आत जपावा, आणि सर्वांना आनंद देत आनंदही घ्यावा’ असे आवाहन केले. त्यावेळी उपस्थितानीही टाळ्यांचा प्रतिसाद दिला.

अनेक कवीनी आपल्या मालवणी कविता सादर करून आपल्या बोली भाषेचा गोडवा जपला. यात बांदा येथील कवी हरिचंद्र भिसे आणि दोडामार्ग येथील कवी रामचंद्र शिरोडकर यांच्या मालवणी कवितेला उस्फूर्त दाद मिळाली. कवी संमेलनाचा प्रारंभ बांदा येथील आठवीत शिकणारा नैतिक मोरजकर याच्या कवितेने झाली. त्याने रानटी हत्तीला कसा त्रास दिला जातो याचे वर्णन करताना उपस्थितांना अंतर्मुख केले. यानंतर सत्यवान साटम यांनी आपली कविता सादर करून तसाच प्रतिसाद मिळविला. सुधीर गोठणकर यांनी उत्तम प्रकारे कविता गायन करून उपस्थितांची वाहवा मिळवली तर अमर पवार यांच्या मालवणी कवितेने सभागृहात हास्य पसरवले.

मंगेश आरेकर यांनी सूत्रसंचालन केले. या कवी संमेलनात भालचंद्र सुपेकर, संचिता चव्हाण, संगीता पाटील, विद्या पाटील , नंदिनी रावराणे , सायली नारकर, सागर कदम, हर्षल तांबे, संजय तांबे, सिद्धेश खटावकर, किशोर कदम, मधुकर मातोंडकर, पल्लवी शिरगावकर , समीक्षा चव्हाण, शर्मिला केळुसकर, संदीप कदम, आर्या कदम, के एस वरदेकर, प्रगती पाताडे, स्वराज चव्हाण, मालिनी लाड, निलेश जाधव, वैष्णवी सुतार आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

यावेळी बोलताना कवी संमेलन अध्यक्ष संध्या तांबे म्हणाल्या साहित्य संमेलने सातत्याने होत असतात परंतु डॉ. निर्मोही फडके यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य आणि संगीत संमेलन आयोजित करून अनेक कला एकमेकाला पूरक असतात हे या संमेलनाचे आयोजक कवी अजय कांडर, स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी दाखवून दिले. आताच्या काळात खूप विपुल कविता लिहिली जात आहे परंतु चांगला कवी अपवादानेच मिळत असतो. अशा चांगल्या लेखनासाठी या साहित्य संमेलनाचा उपयोग होईल. हे संमेलन दरवर्षी आयोजित केले जावे. आपले सर्वतोपरि सहकार्य संमेलनाला मिळेल. सातत्याने असे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात तेव्हा समाजात काही चांगले बदल घडत असतात.साहित्य आणि संगीत बदलाचा विचार करताना अशा संमेलनाची नितांत गरज आहे.

Related posts

अरिष्टकाळाचे भयसूचन : काळाच्या मनाची कविता

कवी अजय कांडर यांना साहित्य चळवळ योगदानासाठी अक्षरमित्र पुरस्कार

पाऊस

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!